Tuesday, September 1, 2026

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले आहेत. पुरात पाच सैनिक वाहून गेले आहेत. तसेच अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात चार नागरिकांचा भूस्खलन झाल्यामुळे मृत्यू झाला.

केओजारिंग-बायचिंग रस्त्यावर मोठे भूस्खलन झाले. या भूस्खलनात तादू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी, बाबुल अली यांचा मृत्यू झाला. दिबांग व्हॅली जिल्ह्यात पसु पानी येथे पाचव्या ग्नेनेडिअरचे दोन शेल्टर वाहून गेले. पुरात सात सैनिक वाहून गेले. यापैकी दोन जणांना वाचवण्यात आले आहे. वाहून गेलेल्या हवालदार उपेंदर, हवालदार कुंदन, हवालदार विनोद, हवालदार आदित्य, हवालदार समुंदा या पाच जणांचा शोध सुरू आहे. सैनिक आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे शोधमोहिम राबवत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >