Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीनंतर JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि अनियमिततेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत होते. सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये जल्लोष केला. (Jharkhand News)



परिक्षा रद्द करण्याचा निर्णय


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, JSSC-CGL सोबतच संबंधित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर झालेले निकाल आणि उमेदवारांच्या निवडीशी संबंधित प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 2014 पासून झालेल्या छोट्या-मोठ्या त्रुटींचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Hemant Soren)



परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने नवीन सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना आपल्या सूचना देता याव्यात यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या सूचनांचा तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून परीक्षा प्रक्रियेत आवश्यक बदल केले जाणार आहेत. (Jharkhand Students)



नवीन समितीची स्थापना


तसेच IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विविध संस्था, तज्ज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करणार आहे. भविष्यात परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी नवीन नियम आणि कार्यपद्धती तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. (India News)



देवेंद्र नाथ महतो यांनी उपोषण सोडले


दरम्यान, आंदोलन करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी रांचीच्या सदर रुग्णालयात आमरण उपोषण सोडले. मंत्री दीपिका पांडे सिंह, मंत्री इरफान अन्सारी आणि जेएलकेएमचे आमदार जयराम महतो यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.


मात्र, विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशीची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आंदोलन पूर्णपणे संपलेले नसल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. (Exam Cancelled)


देवेंद्र नाथ महतो यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र अजून मोठा लढा बाकी असल्याचे सांगितले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे हे पुढील उद्दिष्ट असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.


Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी