Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची पाणी पातळी हळू हळू ओसरत आहे पण अनेकांना अद्याप घरी जाणे शक्य झालेले नाही. जे पुन्हा घरी पोहोचले आहेत ते हळू हळू आपली घरे स्वच्छ करून संसार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतीचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणी पूर्ण ओसरल्यानंर शेतजमिनीच्या स्थितीचा नेमका अंदाज येईल.



पूरग्रस्तांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. प्रभावित नागरिक आपली घरे आणि शेती पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची तसेच सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन अभियानाची सविस्तर माहिती दिली.



आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २० ऑगस्टच्या आकडेवारीनुसार आता सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये झाले आहे. राज्यात ३,०८३ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे. सध्या मदत छावण्यांमध्ये २३८ जणांनी आश्रय घेतला आहे. मदत वितरण केंद्रांवर १,१६५ छावणीबाहेरील रहिवाशांना मदत मिळत आहे. प्रभावित भागांमध्ये गुरुवारी राज्य सरकारने ४ वैद्यकीय पथके तैनात केली. सरकारी अधिकारी नुकसानीचे आकलन करण्यात व्यस्त आहेत.
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी