Thursday, September 3, 2026

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

मंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  ( Mumbai Goa Highway)

"कोकणातील रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सध्या दुभाजक, उड्डाणपूल, साईड पट्टी इत्यादी कामे सुरू असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.  वाहतुकीसाठी अपेक्षित सोयी सुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे होणारी टोल आकारणी बंद व्हावी या कोकणवासीयांच्या भावनेचा आदर करत टोलवसुली स्थगित करावी" अशी मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.

भविष्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांना टोलमधे सवलत देण्याबाबतही विचार व्हावा अशी विनंती ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे. ( Highway Toll Postponement)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >