Nashik : नाशिककरांनो सावधान ! राडारोडा टाकलात तर दहापट दंड अन् थेट गुन्हा

Nashik : नाशिक शहरात रस्ते, नाले, मोकळे भूखंड आणि नदीपात्रात अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात आता महापालिकेने (Nashik Municipal Corporation) कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांकडून तो हटविण्यासाठी महापालिकेला येणाऱ्या खर्चाच्या तब्बल दहापट रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. एवढंच नाही, तर संबंधितांविरोधात थेट फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला असून, शहरात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management Rules, 2016) ची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.



रस्ते, नाले आणि नदीपात्रात राडारोडा टाकण्यास बंदी


बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणारा मलबा रस्ते, पदपथ, नाले, मोकळ्या जागा किंवा नदीपात्रात टाकण्यास पूर्णपणे मनाई आहे. महापालिकेच्या अधिकृत यंत्रणेमार्फत राडारोडा उचलून नेण्यासाठी प्रतिटन ८०० रुपये वाहतूक शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, कुणी अनधिकृतपणे राडारोडा टाकताना आढळल्यास तो हटवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या दहापट रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे शहरात कुठेही राडारोडा टाकून मोकळं होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.



कचरा जाळलात तर २५ हजारांचा दंड


फक्त राडारोडाच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आणि कचरा जाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. पालापाचोळा, प्लास्टिक किंवा इतर प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर जाळल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसंच, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड, तर कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण न केल्यास प्रकारानुसार ३०० ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.



चार प्रकारांत कचरा विलगीकरण बंधनकारक


नाशिक शहरातील नागरिक, संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करणं आता बंधनकारक असणार आहे. कचऱ्याचं ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजीचा कचरा, अशा चार प्रकारांत विलगीकरण करावं लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनाही स्वतंत्र नियमांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे. शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावरही महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकचा तिसऱ्यांदा वापर केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.



शहर स्वच्छ ठेवणं प्रत्येकाची जबाबदारी


शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं आवाहन आयुक्त मनिषा खत्री यांनी केलं आहे. विशेषतः बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकून रस्ते आणि नाले अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे नाशिककरांनी कचऱ्याचं योग्य विलगीकरण करावं, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. एकूणच, नाशिक शहरात आता राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडासोबतच फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने नियम मोडणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे.

Comments
Add Comment

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ मुंबई (विशेष

Solapur Crime : शेअर मार्केटमध्ये २० लाखांचं झालं नुकसान; कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून घरफोडीचा प्रयत्न, पण घडलं काहीतरी वेगळंच...

सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तरुणाने ६१ वर्षीय वृद्धाचा खून करून

Harmanpreet Kaur : भारत-पाकिस्तान सामन्यात हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक विक्रम; १५० T20I सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी पहिली क्रिकेटपटू

दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय

Ashish Shelar : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी