Nashik : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
Nashik Breaking News : नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी ...
आतापर्यंत १५४ परवाने निलंबित
तपासणीदरम्यान ई-पॉस मशीनमध्ये अनियमितता, दर व साठा फलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर नसणे आणि शेतकऱ्यांना पावती न देणे आदी त्रुटी आढळल्या. संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.९ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत खतांचे १०८, बियाण्यांचे २६ आणि कीटकनाशकांचे २०, असे एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
Nashik Mhada Scam : नाशिकमधील बहुचर्चित सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासात एकापाठोपाठ एक धक्कादायक ...
परवान्यांवर सर्वाधिक कारवाई करणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ठरला आहे. निकृष्ट दर्जाच्या किंवा जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कृषी सेवा केंद्रांनी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच निविष्ठांची खरेदी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.






