Diveagar Tourist Rescue : पुण्याचे तीन पर्यटक बुडता बुडता वाचले; दिवेआगरच्या स्थानिकांचे शौर्य

रायगड : पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटकांना दिवेआगर समुद्रकिनारी बुडताना स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत जेट स्कीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. आदित्य भिसे (२४), अभिषेक साळवे (२३) आणि भूमी बोऱ्हाडे (२१) हे समुद्रात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात ओढले गेले. मोठ्या लाटांमुळे तिघेही बुडू लागल्याने काही काळ समुद्रकिनारी धावपळ उडाली. पोर्ट केबिन विसर्जन पॉईंटवर कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे यांनी पर्यटकांचा मदतीसाठीचा आवाज ऐकताच बचावकार्यासाठी आवाहन केले. त्यानंतर दिवेआगर येथील गोविंदा मिरवणुकीत सहभागी असलेले प्रणय चोगले, विघ्नेश चोगले, योगेश चोगले, विष्णुदास चोगले यांच्यासह इतर ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. जेट स्कीच्या सहाय्याने त्यांनी समुद्रात उतरून तिन्ही पर्यटकांना बाहेर काढले.



पाण्यात बुडाल्याने तिघांच्या नाकात व तोंडात पाणी गेले होते. त्यांना तातडीने बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी रुग्णालयात जाऊन पर्यटकांची भेट घेतली. पर्यटकांनी समुद्रात पोहताना पाण्याची खोली, लाटांचा वेग आणि समुद्राची स्थिती लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे तीन पर्यटकांचे प्राण वाचल्याने त्यांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक होत आहे. वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेता समुद्रकिनारी जीवरक्षक, बचाव साधने आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या

Prakash Abitkar : मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मुंबई :

C. P. Radhakrishnan : तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे; उपराष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना आवाहन

गुवाहाटी : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कोकणवासीयांसाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या

Ashish Shelar : आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे, निर्धारित कालावधीत पूर्ण करावी; मंत्री आशिष शेलार यांनी दिले निर्देश

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती