गुवाहाटी : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि आपल्या मित्रांनाही त्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना 'अंमली पदार्थांना नाही म्हणा' अशी शपथ दिली. त्यांनी भर दिला की विद्यार्थ्यांनी जबाबदार पर्याय निवडले पाहिजेत आणि आपला वेळ, आरोग्य व भविष्याचे रक्षण केले पाहिजे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन गुवाहाटी येथील गीतानगर काॅलेजच्या (पूर्वीचे कन्या महाविद्यालय) सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांनी महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटनही केले. उच्च शिक्षणासाठी पाच दशकांची समर्पित सेवा पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना राधाकृष्णन म्हणाले की, गीतानगर काॅलेजने आसामच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात, विशेषतः शिक्षण, ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून तरुण महिलांच्या पिढ्यांना सक्षम बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी आसामचे वर्णन समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरांची भूमी असे केले. त्यांनी आसामच्या भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक आणि स्वदेशी परंपरांच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या विशिष्ट योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी देशासाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत ठरलेल्या लाचित बोरफुकन यांच्या शौर्य आणि देशभक्तीचेही स्मरण केले.
Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येच्या वाढीवर आणि विकासावर दिलेल्या भराचा उपराष्ट्रपतींनी प्रामुख्याने उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की आसाम, आपल्या समृद्ध नैसर्गिक संसाधने, जंगले आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या चहाच्या बळावर प्रचंड क्षमता बाळगून आहे आणि सध्या विकासाचा एक उल्लेखनीय टप्पा अनुभवत आहे. शिक्षणाच्या परिवर्तनात्मक भूमिकेवर भर देताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केवळ कारकिर्दीसाठी तयार करू नये, तर लोकशाही, घटनात्मक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्र उभारणीसाठी वचनबद्ध असलेले जबाबदार नागरिक देखील घडवले पाहिजेत. ते म्हणाले की, भारताची युवा लोकसंख्या हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींमुळे तरुण विकसित भारताच्या उभारणीत प्रमुख भूमिका बजावू शकतात.
मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये झालेल्या प्रगतीचे आणि परिवर्तनाचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, आसाम अलिकडच्या वर्षांत सर्वात वेगाने वाढणारी राज्य अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असून, त्याची अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. त्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीसोबतच चहाच्या बागेतील समुदायांच्या विकासावरही प्रकाश टाकला.
नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटर ...
या प्रसंगी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा, आसामचे शिक्षण मंत्री डॉ. रणोज पेगू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आसामचे माननीय राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे माननीय मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा आणि इतर मान्यवरांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. उपराष्ट्रपती 6 ते 9 सप्टेंबर 2026 या कालावधीत आसाम, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या आसाम दौऱ्यादरम्यान, ते गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या (एसएसयूएचएस) दीक्षांत समारंभाला आणि गुवाहाटी विद्यापीठातील कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहेत.