नवी दिल्ली : नवी दिल्लीत १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि चीनचे ...
देवगिरी निवासस्थानी बैठक
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थ खात्याबाबतच्या पुढील भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरता स्वतःकडे ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सोपविले जाईल, असे त्यावेळी संकेत देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडेच राहिले आहे. राष्ट्रवादीला अर्थ खाते कधी दिले जाणार, असा प्रश्न माध्यमांनी फडणवीस यांना विचारला होता. त्यावेळी ‘सध्यातरी हे खाते माझ्याकडे आहे’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले होते..
Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता ...
अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे कार्यभार
अर्थ खाते राष्ट्रवादीकडे पुन्हा देण्याचा मुद्दा आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत आला आहे. त्यासाठी केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केल्याचे मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भेटीत अर्थ खात्याची मागणी करण्याची शक्यता आहे. शाह १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार असून, संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.