Vishwas Patil News: "दहिहंडीतील लावणी म्हणजे सूज..." , कादंबरीकार विश्वास पाटील यांची टीका

मुंबई: मुंबईमध्ये 'प्रकाशचित्रांतून लोक कलावंतांचे स्मृतीवंदन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लावणीच्या नावावर सुरू असलेल्या धांगडधिंग्यावर टीका केली आहे. विश्वास पाटील यांच्या टीकेची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या प्रकरणामुळे सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. त्याच धर्तीवर ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मराठीमध्ये बाळस धरणे आणि सूज असे दोन शब्द आहेत दोघांचे अर्थ भिन्न आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात खेडापाड्यात जतन करणाऱ्या लोककलांचा गौरव कलेसोबतच आज शहरी भागात दहीहंडीमध्ये जो धांगडधिंगा सुरू आहे, ती म्हणजे लोककला आणि लावणी या कला प्रकाराला पैशांसाठी आलेली सूज आहे."



महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिश्मा सभागृहात उत्साहात बुधवारी संपन्न झाला.लेखक- फोटोग्राफर डॉ. नितीन सोनावणे यांनी लिहिलेल्या आणि छायाचित्रित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या स्मृतींना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासोबतच शेखर निरंजन भाकरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.



पुस्तक प्रकाशनावेळी मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले की, "लोककला या मानवी मनाला आनंद देणारी ऋषीतुल्य व्यवस्था आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये मानवी मनातल हलकल्लोळ, प्रश्न आणि त्याचे दु:ख याचे निराकारण करण्यासाठी प्रथम ऋषी कुळाची व्यवस्था झाल्याचे दिसून येते पण त्यातूनही मानवी मनला शांतता मिळेन आणि दु:ख निवारण होई ना, तेव्हा पुन्हा कुलदैवत व उपास्य देवतांची रचना करण्यात आली, मात्र त्यानंतर ही मानवी मनला शांतता मिळत नाही हे लक्षात आले व उपास्य दैवते व कुलदेव, कुलस्वमीनीची आराधना करण्यासाठी समाजाने जी व्यवस्था उभी केली ती म्हणजे लोककला होय, असे जाणकरांच्या संशोधनातून पुढे येते आहे. ज्ञान, मनोरंन आणि प्रबोधन तसेच दैवतांची आराधना, उपासना या साठी समाजाने निर्माण केलेली लोकला ही व्यवस्था ऋषीतुल्य आहे, अशा शब्दात मंत्री शेलार यांनी लोकलेचा गौरव केला. तसेच नितीन सोनावणे यांनी अत्यंत परिश्रमपुर्वक अशा अस्सल लोकलावंताना शोधून त्यांचे जीवन कॅमेऱ्यात कैद केले आहे हे काम मोठे आहे त्यामुळेच शासनाने त्यांचे पुस्तक प्रकाशित करुन हा ठेवा जतन करण्याचे काम केले आहे." असेही त्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या

Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार

कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप मुंबई

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावरील अनधिकृत मशीद हटवा!

- ‘एमएमआरडीए’चे निर्देश; ‘लँड जिहाद’ झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज

Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन (Pradeep Jain) यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची

MPSC Group C : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार नवी परीक्षा

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25

Mumbai airport illegal mosque : मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत मशिदीवर कारवाईचे MMRDA चे निर्देश; किरीट सोमय्या यांची FIR नोंदवण्याची मागणी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) टर्मिनल २ (T2) परिसरातील