नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे.(BRICS Summit 2026)
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्यातील संबंध
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (ACO) शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली होती. या प्रदेशात दीर्घकाळ शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. तसेच ब्रिक्स आणि एससीओसारख्या बहुपक्षीय संघटनांमध्ये इराणसोबत एकत्रितपणे काम करण्याची भारताची तयारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Iran President India Visit)
व्यापार आणि ऐतिहासिक संबंधांवर भर
इराणसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि त्यात विविधता आणणे यासाठी नवी दिल्ली कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले असून विविध क्षेत्रांमधील ऐतिहासिक संबंध आणखी दृढ करण्याच्या भारताच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला आहे.(BRICS Summit 2026)
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्या अजेंड्यावर भाष्य केले. बहुपक्षीय कूटनीतीमुळे द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीला आणखी वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये संवाद आणि विचारविनिमय सुरू ठेवण्याची संधी आम्ही निश्चितच वापरू.”(Iran President India Visit)
एससीओ शिखर परिषद आणि ब्रिक्ससारख्या प्रमुख बहुपक्षीय गटांमध्ये भारताची प्रभावी भूमिका असल्याचेही बघाई यांनी अधोरेखित केले. भारत हा शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्स या दोन्ही संघटनांचा सदस्य असून, व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या बाबतीत भारतासोबतचे संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.(BRICS Summit 2026)
नवी दिल्ली: बँकेत महत्त्वाचं काम असेल तर ग्राहकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी एकदिवसीय संपाची हाक ...
चाबहार बंदराला प्राधान्य
चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांवर बोलताना त्यांनी कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांना, विशेषतः चाबहार बंदराला, दोन्ही देशांसाठी सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगितले. इराण आणि भारत यांच्यातील चर्चेत चाबहार बंदराचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही देशांमधील संबंध अतिशय चांगले आहेत आणि ते सातत्याने अधिक दृढ होत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.(BRICS Summit 2026)