मुंबई : चेंबूरच्या पांजरापोळ परिसरात अनेक भटक्या मांजरांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडवून दिल्यानंतर अटक करण्यात आलेल्या संशयिताला अवघ्या २४ तासांत जामीन मिळाल्याने प्राणीप्रेमी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. त्याच्यावर मांजरांची हत्या आणि मृतदेहांची विटंबना केल्याचा आरोप आहे. मात्र, या आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होणे बाकी आहे.(Animal Cruelty Case)
मुंबई : गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच मुंबईतील मालाडच्या कांचपाडा परिसरातील गणपतीच्या मूर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ...
२० हून अधिक मांजरांच्या मृत्यूचा संशय
चेंबूरमधील पांजरापोळ आणि परिसरात ऑगस्टपासून मोठ्या संख्येने मांजरे आणि पिल्ले मृतावस्थेत आढळून येत होती. काही मृतदेहांवर गंभीर जखमा आणि विटंबनेच्या खुणा आढळल्याचे पोलिस आणि प्राणी हक्क संघटनांनी सांगितले. स्थानिक प्राणीसेविका रुबीना पठाण यांनी या घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनांनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष एका ४० वर्षीय संशयिताकडे गेले. त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान त्याने मांजरांना मारल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. मात्र, नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.(Animal Cruelty Case)
मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा राज्याच्या सीमांपलीकडचे ...
अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जामीन
संशयितावर भारतीय न्याय संहितेतील कलम ३२५ आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याला जामीन मिळाला, अशी माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्राणीप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली असून, प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांमध्ये कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, २० हून अधिक मांजरांच्या मृत्यूमागे याच व्यक्तीचा सहभाग आहे का, तसेच या घटनांमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वी PETA Indiaने आरोपीची माहिती देऊन अटक आणि दोषसिद्धीस मदत करणाऱ्यास ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते.(Animal Cruelty Case)
जामीन मिळाल्यानंतरही या प्रकरणाचा तपास थांबलेला नसून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. चेंबूरमधील या घटनांमुळे भटक्या प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




