काँग्रेस म्हणजेच विश्वासघात! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसी कारभाराचा पंचनामा

लातूर : देशाने काँग्रेसला ६० वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४ मध्ये सुमारे १०० सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसी कारभाराचा पंचनामा लातूरच्या जनतेसमोर केला.


लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी माढा, लातूर, धारिशिव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरादर हल्लाबोल केला. गेल्या १० वर्षात मी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत वापरला, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.


काँग्रेसच्या राजवटीत रोज सकाळी वर्तमानपत्रात नवीन घोटाळा उघड व्हायचा. कोलगेट घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, २-जी घोटाळा... पण आज बातम्या येतात, इथे इतके करोडो रुपये पकडले गेले. तिकडे इतके करोडो रुपये पकडले गेले, नोटांचे बंडले सापडले. काँग्रेसने आपल्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने आपल्या मुलांसाठी कोणता वारसा सोडला? पैसा, देशातील प्रमुख ठिकाणी जमिनी, सत्ता आणि विशेषाधिकार आणि ६ दशकात देशाला कोणता वारसा दिला? तर फक्त गरिबी, अशी घणाघाती टीकाही मोदींनी केली.


महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात, तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते. १५ वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यांनी मावळत्या उन्हात दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली होती, पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित असलेले १०० पैकी ६३ प्रकल्प आम्ही पूर्ण केले. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा. पाण्याच्या थेंबासाठी लोक वर्षानुवर्षे त्रासले होते, असे मोदी यांनी आपल्या भाषणात यावेळी सांगितले.


काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, देशात १० वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते कृषीमंत्री होते. ते बलाढ्य नेते दिल्लीवर राज्य करायचे, तेव्हा उसाची एफआरपी २०० रुपयांच्या आसपास होती. आज भाजप सरकारच्या काळात उसाची एफआरपी ३५० रुपयांच्या आसपास आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे, यातील फरक पाहत आहे. जे काँग्रेस ६० वर्षात करू शकले नाही, ते आम्ही १० वर्षात करुन दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

Shri Mahalakshmi Jagdamba Sansthan : कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला शासकीय जमीन

- मंत्रिमंडळाची मंजुरी; मुंबईतील कैवल्यधाम सेंटरच्या भाडेपट्ट्याचेही सवलतीच्या दराने नूतनीकरण मुंबई : कोराडी

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Kolhapur Mahalaxmi Temple : महालक्ष्मी मंदिराच्या दुरुस्तीतील २१ कोटींच्या कामाची चौकशी करा; वीरेंद्र इचलकरंजीकरांची मागणी

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखाना यांच्या दुरुस्ती व

Jalgaon : जाहीर केले 51 हजार, हातात दिले फक्त 5,100 ! जळगावात दहीहंडीवरून गोविंदांचा रस्ता रोको

Jalgaon : दहीहंडी उत्सवात सात थर लावून जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांच्या हातात बक्षिसाच्या नावाखाली अवघे 5 हजार 100

BJP News: भाजपाकडून अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, वाचा यादी...

मुंबई: भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

Gondia Accident News: रोजगाराच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, गोंदिया- बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

गोंदिया: गोंदिया- बालाघाट मार्गावरील नागरा- मोहरनटोली परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपच्या भीषण