सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी सरकारशी संबंधित बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश RBI कडून देण्यात आले आहेत.


रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने व्यवहार करणाऱ्या बँकांच्या (राष्ट्रीयकृत बँका अर्थात नॅशनलाइज्ड बँका) शाखा ३१ मार्च रोजी सामान्य नागरिकांसाठी खुल्या राहणार आहेत. या निर्णयामुळे वित्तीय वर्ष संपताना होणारे सरकारी आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करता येणार आहेत.


RBI ने स्पष्ट केले आहे की, भारत सरकारच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण वित्तीय वर्षाच्या अखेरच्या दिवशी कर संकलन, शासकीय देयके, अनुदान वितरण, विभागीय हस्तांतरणे तसेच इतर आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. अशा वेळी बँक सेवा बंद राहिल्यास लेखाजोखा आणि सेटलमेंट प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.


या निर्णयानुसार, कर भरणे, चालान जमा करणे, सरकारी खात्यांशी संबंधित पेमेंट्स तसेच इतर शासकीय बँकिंग सेवा ३१ मार्च रोजी उपलब्ध राहतील. त्यामुळे करदाते, व्यापारी, उद्योग आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व संबंधित बँकांना ग्राहकांना याबाबत पूर्वसूचना देण्याचेही आदेश दिले आहेत, जेणेकरून शेवटच्या दिवशी सरकारी व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही. या सुविधांचा योग्य प्रचार करण्यावरही RBI ने भर दिला आहे.


दरवर्षी ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असल्याने सरकारी खात्यांमधील अंतिम नोंदी, समायोजन आणि लेखापरीक्षणपूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या दिवशी बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय सरकार आणि वित्तीय व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. हे परिपत्रक RBI चे मुख्य महाप्रबंधक यांच्या कडून जारी करण्यात आले असून, ते देशभरातील सर्व एजन्सी बँकांना लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वित्तीय वर्षाच्या अखेरीस सरकारी व्यवहार अधिक सुलभ आणि सुरळीत पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून