Rajya Sabha : राज्यसभेसाठी भाजपकडून 'सोशल इंजिनिअरिंग'; विनोद तावडे, आठवलेंसह दोन नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली असून, नेहमीप्रमाणे यंदाही 'धक्कातंत्रा'चा अवलंब केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या दिग्गज नेत्यांसोबतच, भाजपने माया ईवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपने यंदा उमेदवारी देताना राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे.


धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.





विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात:


पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार, राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित जागांवर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार गुरुवारी अर्ज दाखल करतील.



महाविकास आघाडीची कोंडी?


दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांची केवळ एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, या जागेवर शरद पवार गट, काँग्रेस की उबाठा गट आपला उमेदवार देणार, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर अशा सर्वच समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकता उरते की काही वेगळे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय