आसाम : आसाममधील धुबड़ी, कोकराझार आणि बंगाईगांव जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच शनिवार ९ मे रोजी वेगवेगळ्या वेळेस भूकंपाचे (Assam Earthquake) धक्के जाणवले. मात्र, सध्या कुठूनही कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीची अथवा अप्रिय घटनेची माहिती समोर आलेली नाही.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक लोक घरांमधून तसेच कार्यालयांमधून बाहेर पडले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.






