Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग तालुक्यातील 85 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकण्यात आला. ही हत्या महिलेच्या जवळच्या नातेवाईकांनीच केली आहे, असं पोलीस तपसात उघड झाले आहे.



मृत महिलेचे नाव सुनंदा लक्ष्मण पाटील (वय 85) आहे. त्या अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील रहिवासी होत्या. 31 मेपासून त्या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून तपास सुरू करण्यात आला, मात्र पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) आणि त्याचा साथीदार रितेश नरेश लोहार या दोघांनाही अटक केली आहे. आरोपी अनदर्श हा मृत महिलेचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.



नेमकी हत्या का करण्यात आली ?


पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध महिलेकडे असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आरोपींची नजर होती. दागिने चोरण्याच्या उद्देशाने या दोघांनी ही हत्या केली . सर्वप्रथम त्यांनी सुनंदा पाटील यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने तिनविरा परिसरात नेऊन गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकला. वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार आणि तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कट उलगडला.


पोलिसांचा तपास सुरू


मांडवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दागिन्यांसाठी आपल्याच नातेवाईकाचा जीव घेणाऱ्या या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर आता समोर आलेल्या या हत्याकांडाने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.