मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने वेगाने आगेकूच करत गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. आता पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीत प्रवेश करण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण आणि नैऋत्य मौसमी वाऱ्यांची वाढती तीव्रता लक्षात घेता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत ५ ते ११ जूनदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी :
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
येलो अलर्ट असलेले जिल्हे :
पालघर, ठाणे, मुंबई (उष्ण व दमट हवामानासह पावसाची शक्यता) नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर, बीड बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
मुंबईकरांना अजून थोडी प्रतीक्षा :
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात आज दिवसभर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सध्या मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात असून हवेत आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढील काही दिवसांत मान्सून मुंबईकडे सरकल्यानंतर वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा :
उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून, शेतकरीही आता खरीप हंगामाच्या तयारीकडे आशेने पाहत आहेत.






