Nashik Rain Update : अहिल्यानगरमध्ये ११२% पाऊस, तर नाशिकमध्ये....; नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?

Nashik Rain Update :गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने धुव्वादार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले भरले असून धरणे ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. नाशिक विभागात सर्वाधिक पावसासाठी इगतपुरी तालुका ओळखला जातो. या तालुक्यात १,७३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे.




तर अहिल्यानगर( Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सरासरी २६६ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल २०२ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सरासरी ४४३ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस झाला आहे. तर संगमनेर तालुक्यात १७१ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२३ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक (Nashik) विभागात १ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ३७७.३ मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत ३६८.० मिलीमीटर, म्हणजेच ९७.५ टक्के पाऊस झाला आहे. तर जून महिन्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. जुलैमध्ये मात्र पावसाने ही कसर चांगलीच भरून काढली.

नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?


नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ५३१.३ मिलीमीटर (१०४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २४०.३ मिलीमीटर (१११.८ टक्के), धुळे जिल्ह्यात ३४५.७ मिलीमीटर (११३.२ टक्के) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात ३८९.५ मिलीमीटर (११७.४ टक्के) पाऊस झाला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मात्र आतापर्यंत २६३.७ मिलीमीटर (५४.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.



१० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस


नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३४ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १२, जळगाव जिल्ह्यातील १०, अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ आणि धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. विभागातील १० तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला.


यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जामनेर, बोदवड आणि जळगाव, नाशिक जिल्ह्यातील पेठ व येवला, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता व नेवासा तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा समावेश आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विभागात सर्वात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (३७.१ टक्के), अक्राणी (४०.८ टक्के), नंदुरबार (४६.९ टक्के), शहादा (४७.६ टक्के) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (४८.२ टक्के) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून