Eknath Shinde : 'ज्ञानाचा महासागर हरपला'; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन


कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने "ज्ञानाचा महासागर हरपला असून, ही न भरून येणारी पोकळी आहे," अशा अत्यंत भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



डॉ. डी. वाय. पाटील यांनी शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू करत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशभरात शिक्षणाची नवी दालने उघडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. पाटील यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. विविध उच्च पदांवर काम करूनही त्यांनी सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, असे शिंदे म्हणाले.



मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील आणि त्यानंतरच्या अनेक आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णालयाची आवश्यकता निर्माण झाली असता, बाळासाहेबांनी हे महाविद्यालय आपल्या परिवाराचा भाग असल्याची भावना ठेवून तातडीने आवश्यक मदत व मान्यता मिळवून दिली होती. अशा अनेक प्रसंगांत त्यांचे परस्परांवरील विश्वासाचे नाते दिसून आले.



डॉ. डी. वाय. पाटील हे सर्वांशी सलोख्याने वागणारे, सर्वांना आपलेसे करणारे आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. सहकार, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी राहील, असेही शिंदे यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याचाही उल्लेख केला. डी. वाय. पाटील विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले. हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण आहे. त्याच संस्थेतून आमचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी आमच्या कुटुंबाचे भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले. त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


डॉ. पाटील यांच्या कार्याची खरी पोचपावती म्हणजे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कालपासून लाखोंच्या संख्येने उमटलेला जनसागर होय. सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या आणि प्रेमाने सर्वांना जोडणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाविषयी जनतेच्या मनात असलेला आदर यावरून स्पष्ट होतो, असेही शिंदे म्हणाले. डॉ. डी. वाय. पाटील यांचे एक वाक्य कायम स्मरणात राहील, असे सांगत शिंदे म्हणाले, "मोठी स्वप्ने पाहा; पण ती स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पाहा." या एका विचारातून त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रत्यय येतो. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय