Ravi Shankar Prasad : 'राहुल गांधी अराजकतेचे राजकारण करतात'

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान कथित पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या साहिल लोचबसोबत (Sahil Lochab) काँग्रेस खासदार राहुल गांधी संसद मार्गावरील डीसीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर ‘अराजकतेचे राजकारण’ केल्याचा आरोप केला. राहुल गांधी कोणतीही परवानगी न घेता आणि पूर्वसूचना न देता आंदोलनाला बसल्याचे ते म्हणाले.






राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांनी लोकशाही पद्धतीने राजकारण करण्याऐवजी अराजकतेचे राजकारण सुरू केले आहे. संबंधित घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. या प्रकरणाचा संदर्भ देताना प्रसाद यांनी सांगितले की, संबंधित पीडितानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे असून समितीत अन्य न्यायाधीश तसेच सीबीआयचे माजी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. ‘गोळीबार झाला की नाही, याचीही चौकशी होणार आहे. अशा परिस्थितीत नियम आणि कायद्याचा आदर न करता केवळ आपल्या इच्छेनुसार आंदोलनाला बसणे योग्य आहे का ?’ असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.



प्रसाद यांनी काँग्रेसच्या ‘वंदे मातरम्’वरील भूमिकेवरही टीका केली. काँग्रेस या मुद्द्यावर अडचणीत आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींचे आंदोलन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशात चुकीचा संदेश गेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अराजकतेच्या दिशेने जात आहे. ‘वादविवाद करा, कायदा आपले काम करेल; मात्र सुरू असलेल्या चौकशीच्या प्रकरणावरून पोलिस ठाण्याबाहेर धरणे देणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून