Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत विचार विनिमय करण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नामांतराच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एकादस्यीय समितीकडे असणार आहेत.(Mangal Prabhat Lodha)



राज्याच्या कौशल्य विकास विभागाने सोमवारी शासन निर्णय (GR) जारी करत नामांतराचे सर्वाधिकार विभागाच्या मंत्र्यांकडे राहतील, अशी व्यवस्था केली आहे. राज्यातील शासकीय आयटीआयच्या नावात बदल करण्यासाठी कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नामांतराचा निर्णय घेताना संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करावा, अशी तरतूद करण्यात आली होती.(Mangal Prabhat Lodha)


मात्र, सोमवारी जारी केलेल्या जीआरनुसार आयटीआय-सोबतच शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराचे अधिकारही विभागाचे मंत्री असलेल्या लोढा यांच्या समितीकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, नव्या निर्णयात पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करण्याची पूर्वीची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे नामांतराच्या प्रस्तावांवरील निर्णय प्रक्रियेतून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एका अर्थाने दूर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच

Dadaji Bhuse : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

School Material Distribution : शालेय साहित्य वाटपावर मोठं स्पष्टीकरण; वह्यांबाबतचा दावा फोल

शालेय वस्तूंच्या वाटपावरून विरोधकांचा फेल नॅरेटिव्ह सर्व साहित्यांचे वाटप शाळांमध्ये अंतिम

Vishakha Raut : उबाठाच्या विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर

Recruitment Exam : भरती परीक्षांमध्ये मोठ्या सुधारणा होणार? सरकारचा उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यभर उमेदवारांशी थेट संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे