मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत विचार विनिमय करण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नामांतराच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एकादस्यीय समितीकडे असणार आहेत.(Mangal Prabhat Lodha)
Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – ...
राज्याच्या कौशल्य विकास विभागाने सोमवारी शासन निर्णय (GR) जारी करत नामांतराचे सर्वाधिकार विभागाच्या मंत्र्यांकडे राहतील, अशी व्यवस्था केली आहे. राज्यातील शासकीय आयटीआयच्या नावात बदल करण्यासाठी कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नामांतराचा निर्णय घेताना संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करावा, अशी तरतूद करण्यात आली होती.(Mangal Prabhat Lodha)