Ahilyanagar : कांद्याने केला वांदा ! शेतातून कांदा आणला म्हणून बहिणीवर हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा

Ahilyanagar : शेतातील कांदा आणल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. सख्ख्या भावाने आधी बहिणीला मारहाण केली आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तिच्या घरात घुसून महिलांसह नातेवाईकांवर लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत तालुक्यातील राखसवाडी खुर्द येथे ही घटना घडली आहे. अलका भाऊसाहेब चोरमले यांनी याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामदास पिंगळे, रखमाजी विठ्ठल रुपनर, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा बापू कोळपे आणि रुपाली रुपनर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


अलका चोरमले या पतीच्या निधनानंतर काही वर्षांपासून राखसवाडी खुर्द येथे आई-वडिलांकडे राहत आहेत. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ रखमाजी रुपनर हा शेजारीच कुटुंबासह राहतो. ४ सप्टेंबर रोजी सकाळी रखमाजी अलका यांच्या घरी आला. ‘माझ्या वावरातील कांदे का आणलेस?’ असा जाब विचारत त्याने शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच ‘तू इथे राहायचं नाही, निघून जा,’ असं म्हणत तो निघून गेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती अलका यांनी आपल्या बहिणी आणि मुलाला फोनवरून दिली.



दोन दिवसांनी पुन्हा वाद


६ सप्टेंबर रोजी अलका यांना भेटण्यासाठी त्यांच्या बहिणी राधा आखाडे, आशा गोरे आणि मुलगा विकास चोरमले हे घरी आले होते. याचवेळी रामदास पिंगळे तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. जाब विचारल्याच्या रागातून त्याने राधा यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रखमाजी रुपनर याने आशा यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने पाठीत मारहाण केली. तर राहुल पिंगळे याने नंदिनी हिलाही लाकडी काठीने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.



महिलांसह मुलालाही मारहाण


आबा पिंगळे आणि बिरा बापू कोळपे यांनी महिलांसह विकास चोरमले यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी अलका यांचे चुलते आणि चुलती मध्ये आले असता, रामदास पिंगळे याने त्यांच्या चुलत्याच्या डोक्यातही लाकडी काठीने मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मारहाणीचा प्रकार सुरू असतानाच रुपाली रुपनर हिने ‘इथून निघून जा, पुन्हा इथे आलात तर जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


कांदा आणण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Dharmavir Fort : धर्मवीर गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा, आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

Dharmavir Fort : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक

Nitesh Rane : बंदर प्रकल्पांच्या कामांना गती द्या; कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करा - नितेश राणे

मुंबई : राज्यातील बंदरे विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांना वेग देत त्यांचे प्रभावी नियोजन

PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बनावट PMO अधिकाऱ्याचा रुबाब; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात

Kanpur Murder Case : करोडपती सुनेनेच रचला सासऱ्याच्या हत्येचा कट ! ‘तो’ मेसेज अन् फोन कॉल्समुळे सुनेचा भांडाफोड

Kanpur Murder Case : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रतन ऑर्बिट परिसरात झालेल्या विनीत मिनोच हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा

Mumbai Local Train Update : टिटवाळ्यात १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

मुंबई : १५ डब्यांच्या लोकल गाड्या सामावून घेण्यासाठी टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे काम

Atal Setu Bappa Agaman : मावळता सूर्य, अथांग समुद्र अन् बाप्पाचे रूप! अटल सेतूवरील गणरायाच्या आगमनाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

नवी मुंबई : आगामी गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या