तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या
मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा कोणताही संबंध नसेल, तर ते वकिलांमार्फत हस्तक्षेप याचिका का दाखल करतात? सुनावणीवेळी त्यांचे वकील न्यायालयात का उपस्थित राहतात, असा सवाल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिशा सालियन यांच्या आई-वडिलांना धमक्या का दिल्या, असा मुद्दाही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
दिशा सालियन प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होत असून या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना राणे यांनी, ‘संबंधच नसेल तर त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात हस्तक्षेपासाठी प्रतिज्ञापत्र का दाखल केले ?’ असा सवाल केला. प्रत्येक सुनावणीच्या वेळी आदित्य ठाकरे यांचे वकील न्यायालयात का उपस्थित राहतात? महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणात ‘लपवाछपवी’ का करण्यात आली? दिशा सालियन यांच्या आई-वडिलांना शवविच्छेदनाचा अहवाल तत्काळ का मिळाला नाही? तसेच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना धमक्या का दिल्या? या सर्व बाबींचे उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
Musician beaten to death : गायक अंकित बलियानच्या हत्येनंतर गायक बलजीत सिंगच्या संशयास्पद मृत्यूची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका संगीतकाराच्या हत्येची धक्कादायक ...
दरम्यान, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, ठाकरे कुटुंबीयांचा आणि जीडीपीचा काय संबंध, अशी उपरोधिक टिप्पणी राणे यांनी केली. यावेळी ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील प्रश्नावरही राणे यांनी भाष्य केले. सुरुवातीला काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार देण्यात आला असला, तरी आता त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक चित्रपटगृहे तो प्रदर्शित करण्यास उत्सुक असल्याचे राणे म्हणाले. हिंदुराष्ट्रात या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.