नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सपोर्ट स्टाफमध्ये एका मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून प्रमुख खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने संघाच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने संघाचे फिजिओ कमलेश जैन यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले असून ते सध्या नोटीस पीरियडवर आहेत.(Indian cricket team)
खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे बीसीसीआय चिंतेत
अफगाणिस्तानविरुद्ध खेळणारा संघ हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेला संघ आहे. राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे प्रमुख खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स सायन्स टीममधील काही सदस्यांना संघासोबत पाठवणे आवश्यक ठरले असून, फिजिओ कमलेश जैन हे सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत.(Team India support staff change)
नांदेड जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाट परिसरात गुरुवारी सायंकाळी प्रवासी वाहन आणि ...
साडेचार वर्षांनंतर टीम इंडियाची साथ सोडणार?
कमलेश जैन यांनी जून २०२२ मध्ये राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. जवळपास साडेचार वर्षे सपोर्ट स्टाफचा भाग राहिल्यानंतर आता ते हे पद सोडणार आहेत. सततची प्रवासाची धावपळ आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या हे या निर्णयामागची प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. मात्र, याविषयी बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.(Indian cricket team)
सपोर्ट स्टाफमधील सलग तिसरा मोठा बदल
गेल्या काही आठवड्यांत टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल झाले आहेत. इंग्लंड दौरा संपल्यानंतर फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी टीम इंडियाची साथ सोडली. त्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत जोडले गेले आहेत. आता कमलेश जैन यांचा राजीनामा हा सपोर्ट स्टाफमधील तिसरा मोठा बदल ठरत आहे.(Team India support staff change)
मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १२ हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा ...
प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींची डोकेदुखी कायम
दुखापतीतून सावरून वॉशिंग्टन सुंदरने संघात पुनरागमन केले असले, तरी वेगवान गोलंदाज हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिका तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर झाला आहे. इंग्लंड दौऱ्यात पुनरागमन केल्यानंतर राणा तिथेच पुन्हा दुखापतग्रस्त झाला. याशिवाय, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्या दुखापतींबाबतही अद्याप स्पष्टता नाही, तर नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीमुळेही संघाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे बीसीसीआयने फिजिओ आणि स्पोर्ट्स सायन्स विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.(Indian cricket team)