Yavatmal Accident : यात्रा म्हटली की पाळणे आलेच. अनेकांना या रंगेबेरंगी, मोठमोठ्या पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही पण याच पाळण्यामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहे. अनेकांना तर जीवाला मुकावे लागले आहे. असे असले तरी अनेक पाळण्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करत असल्याचं पहायला मिळतं. यवतमाळ जिल्ह्यातही अशी धक्कादायक घटना समोर आली जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी भरलेल्या तान्हा पोळ्याच्या यात्रेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश पाळण्यात (Yavatmal News) बसलेल्या एका महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने त्यांच्या केसांसह डोक्याची चामडीच उपटून निघालीय. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.(Yavatmal Accident News)
नेमकं काय घडलं ?
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या तांन्हा पोळ्याच्या वेळी ही घटना घडली. आकाश पाळण्यात मोठ्या उत्साहात बसायला गेलेल्या महिलेचे केस थेट पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह महिलेच्या डोक्याची चामडीही निघालीय.बाली मारोती टाळीकोटे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित यात्रेत फिरण्यासाठी आल्या होत्या. यात्रेचा आनंद घेण्यासाठी त्या आकाश पाळण्यात बसल्या असता, पाळणा वेगाने फिरत असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याची चामडी उपटली जाऊन त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली. (Yavatmal Accident News)
Marathi Actor Facebook Post : एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या फेसबुक पोस्टने त्याच्या चाहत्यांसोबत पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण फेसबुक पोस्ट खळबळ उडवणारीच ...
महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत
घडलेला प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच यात्रेतील नागरिकांनी तात्काळ आरडाओरड करत पाळणा थांबवला. नागरिकांच्या मदतीने जखमी बाली टाळीकोटे यांना पाळण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे यात्रेतील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आनंद उत्साह साजरा करताना काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्ट होते.






