Jalgaon : पावसाने पाठ फिरवताच कपाशीवर ‘लाल्या’चं संकट ! उत्पादन घटण्याची भीती, जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने कपाशीचं मोठं नुकसान झालं. आता उरलेल्या पिकाला पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशीवर ‘लाल्या’च्या समस्येने डोकं वर काढलं आहे. पात्या आणि बोंडधारणेच्या महत्त्वाच्या अवस्थेत असलेल्या कपाशी पिकावर लाल्यासह विविध रोग आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



राज्यात कपाशीचं क्षेत्र साडेचार लाख हेक्टरने घटलं


यंदा विविध कारणांमुळे राज्यातील कपाशीची लागवड सरासरीच्या तुलनेत तब्बल साडेचार लाख हेक्टरने कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत जवळपास सव्वालाख हेक्टरने कपाशीचं क्षेत्र घटलं आहे. त्यातच जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल ३५ हजार हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झालं. उरलेल्या पिकातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच आता पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे.


सध्या कपाशीचं पीक पात्या लागण्यापासून बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. याच काळात पिकाला पुरेसा पाऊस किंवा पाणी न मिळाल्याने पिकावर ताण निर्माण झाला आहे. यामुळे लाल्या, नैसर्गिक गळ, आकस्मिक मर, दहिया आणि करपा यांसारख्या समस्या वाढत आहेत. तसंच रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.



‘लाल्या’ म्हणजे नेमकं काय?


कृषी तज्ज्ञांच्या मते, कपाशीवरील ‘लाल्या हा रोग नसून एक विकृती आहे. विशेषतः अमेरिकन संकरित बीटी वाणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
यामध्ये कपाशीची पानं लालसर, जांभळट किंवा तांबूस होतात. काही वेळा पानांच्या कडा लाल होतात, पाने आकसतात आणि पिकाची वाढ मंदावते. पिकावर पाण्याचा ताण येणे, त्यानंतर अचानक पाणी मिळणे, तापमानातील चढ-उतार आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे ही समस्या वाढू शकते.


महत्त्वाचं म्हणजे पानं लाल झाली म्हणून थेट बुरशीनाशकांची फवारणी करण्याऐवजी पिकाची मुळांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासणं गरजेचं आहे. जमिनीत नत्र आणि मॅग्नेशियमसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल असल्यासही पानांमध्ये लालसरपणा दिसू शकतो. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर आणि रसशोषक किडींचं वेळेवर नियंत्रण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.



शेतकऱ्यांसमोर मोठं संकट


जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राने पिकाची सुरुवातीपासूनच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा कपाशीचं कमी क्षेत्र, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि आता पावसाचा खंड यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लाल्या’च्या संकटातून कपाशीचं पीक कसं वाचवायचं, याचं मोठं आव्हान आता शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे

Comments
Add Comment

Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार, कोणकोणत्या भागांना बसणार फटका

पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच

Police Constable Attack : पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर कोयत्याने हल्ला; गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack)  झाल्याची धक्कादायक

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचे ‘सेकंड ड्रीम होम’ ? 'या' ठिकाणी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता लोणावळ्यात आपलं ‘सेकंड ड्रीम होम’

Radha Patil : राधा पाटील अडचणीत! दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचली, पण...; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पुणे : पुण्यात परवानगी न घेता दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध

Maharashtra Weather : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' जिल्ह्यांवर पावसाचे ढग; हवामान विभागाचा महत्त्वाचा अपडेट

मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही