मुंबई: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक सुरक्षेच्या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा निर्णय घेतला आहे. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (IIT), मुंबईने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार, मशीद आणि माटुंगा स्थानका परिसरातील चार पादचारी पूल त्वरित बंद करण्याचे निर्देश मध्य रेल्वेला देण्यात आले आहेत.(Mumbai Ganpati 2026)
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल असुरक्षित:
२७ ऑगस्ट २०२६ रोजी बीएमसी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर, ३१ ऑगस्ट रोजी आयआयटी मुंबईने आपले स्वतंत्र अहवाल सादर केले. या अहवालानुसार, हे चारही पूल अत्यंत जीर्ण झाले असून त्यांच्या महत्त्वाच्या भागांना गंज लागला आहे. त्यामुळे हे पूल पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक बनले असून ते तातडीने बंद करून त्यांची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.(Mumbai pedestrian bridge closed)
बंद करण्यात येणारे चार पादचारी पूल:
मशीद येथील भंडारी पादचारी पूल (किमी ०/५-६)
मशीद स्थानक पादचारी पूल (किमी १/२-३)
भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल (किमी १०/२२-२३)
गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल (किमी ११/१४-१५)
गणेशोत्सवाच्या गर्दीचा विचार:
गणपती उत्सवादरम्यान रेल्वे स्थानके आणि परिसरामध्ये लाखो भाविकांची गर्दी होत असते. संभाव्य अपघात किंवा अनुचित घटना टाळण्यासाठी हे असुरक्षित पूल बंद करणे अत्यावश्यक आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या पुलांवरून नागरिकांचे सर्व प्रकारचे आवागमन पूर्णपणे प्रतिबंधित असणार आहे.(Mumbai Ganpati 2026)
उत्सवाच्या काळात सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रवाशांनी व नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे आणि बीएमसीतर्फे करण्यात आले आहे.(Mumbai Ganpati 2026)