Saturday, September 12, 2026

Amruta Fadnavis : सणासुदीचा विचार करून माझे भाऊ योग्य तेच करतील; अमृता फडणवीस यांना जरांगेंबद्दल विश्वास

Amruta Fadnavis : सणासुदीचा विचार करून माझे भाऊ योग्य तेच करतील; अमृता फडणवीस यांना जरांगेंबद्दल विश्वास

अहिल्यानगर प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून, राज्य सरकार यावर गांभीर्याने काम करत आहे. सध्याचे सणावारांचे दिवस लक्षात घेऊन माझे भाऊ जे करायचंय ते शांतीपूर्वक करतील, लवकरच या प्रश्नातून मार्ग निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्या माध्यमांशी बोलत होत्या.(Amruta Fadnavis)

यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाल्या, की सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सर्वांनी शांतता राखावी आणि शांततेच्या मार्गानेच विचार करावा. सरकार मराठा आरक्षण विषयावर मार्ग काढण्याच्या दिशेने सकारात्मक काम करत असून, येत्या काही दिवसांत मिळून-मिसळून यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज पुहा फडणवीस यांनी जरांगे पाटील यांचा उल्लेख भाऊ असा केला.(Amruta Fadnavis on Manoj Jarange)

या दौऱ्याप्रसंगी धनश्री विखे, आमदार संग्राम जगताप, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.(Amruta Fadnavis on Manoj Jarange)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >