मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच धावपळीच्या मुंबईच्या किनाऱ्यांवर एक अत्यंत समृद्ध, रंगीबेरंगी आणि अद्भुत असे आंतरज्वारीय (Intertidal) समुद्री विश्व दडले आहे. दुर्दैवाने, मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणामुळे हे विश्व आज धोक्यात आले आहे. याच मूक समुद्री जीवांचा आवाज बनत, मुंबईच्या परळ येथील अभिषेक रविंद्र चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबाने यंदाच्या गणेशोत्सवात 'आम्ही पण मुंबईकर' या अत्यंत उद्बोधक आणि पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.
७२ वर्षांनंतर झालेल्या पुनर्शोधाची रंजक कहाणी
या देखाव्याच्या केंद्रस्थानी 'गोनियोब्रँकस बॉम्बेयानस' (Goniobranchus bombayanus) हा अत्यंत दुर्मिळ आणि रंगीबेरंगी समुद्री जीव आहे. सुमारे १९४६ मध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर या जीवाची पहिली नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर तो काळाच्या पडद्याआड गेला. तब्बल ७२ वर्षांनंतर, नोव्हेंबर २०१८ मध्ये 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' (Marine Life of Mumbai) च्या सदस्यांनी हाजी अलीजवळील 'टाइड पूल'मध्ये (Tide Pool) या जीवाचा पुनर्शोध घेतला. आपल्या मुंबईच्या किनाऱ्यांवर असणाऱ्या या अनमोल खजिन्याची जाणीव नागरिकांना करून देणे, हा या सजावटीमागील मुख्य उद्देश आहे.
Ahilyanagar News : पती आणि प्राथमिक शिक्षिकेतील कथित जवळकीच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारल्याची घटना श्रीरामपूर ...
पूर्णपणे पुनर्वापर साहित्याचा वापर!
समुद्री विश्व का धोक्यात आहे ?
१. समुद्रात टाकले जाणारं प्लास्टिक आणि कचरा २. न प्रक्रिया केलेले सांडपाणी ३. किनाऱ्यांवर होणारे अक्राळविक्राळ बांधकाम ४. हवामान बदल (Climate Change)
या सर्वांमुळे हे आंतरज्वारीय विश्व वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. समुद्री जीवांचे रक्षण करणे म्हणजेच पर्यायाने मुंबईचे आणि मुंबईकरांचे भवितव्य सुरक्षित करणे होय, हाच मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
"कारण आम्ही फक्त समुद्री जीव नाही... आम्हीही मुंबईकर आहोत!"
"मुंबई जितकी माणसांची आहे, तितकीच ती या किनाऱ्यावर राहणाऱ्या हजारो सूक्ष्म जीवांचीही आहे. त्यांना वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे," असा भावूक आणि ठाम विचार चिटणीस कुटुंबाने या देखाव्यातून मांडला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ देखावा न उभारता, समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव करून देणारी ही सजावट पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठी गर्दी करत आहेत.






