नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात झाला. किनवट तालुक्यातील तोटंबा जंगल घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कमांडर जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या दुर्घटनेत 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ( Sahastrakund Waterfall)
मृतांमध्ये तुम सायलू (60), तुम गौरा बाई (60) आणि आवला गंगाधर (55) यांचा समावेश आहे. हे तिघेही तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळातील पार्डी गावचे रहिवासी होते.
मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली. म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशनजवळ ...
मिळालेल्या माहितीनुसार, पार्डी गावातील 10 ते 12 भाविक कमांडर जीपने नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी श्री महादेव मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी आपल्या गावाकडे परतण्यासाठी निघाले.
तोटंबा गावाजवळील जंगल घाटातून जीप जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की जीपचे मोठे नुकसान झाले आणि काही प्रवासी वाहनात अडकले. (Maharashtra News)
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमी प्रवाशांना जीपमधून बाहेर काढून मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
अपघातातील 7 जखमींना तातडीने तेलंगणातील कुबेर मंडळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे पार्डी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ( Road Accident)






