Raj Thackeray : राज ठाकरे झाले दुसऱ्यांदा आजोबा

- अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सोमवारी आनंदाचे आगमन झाले. त्यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाले असून, त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ठाकरे कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाल्याने ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा आजोबा होण्याचा योग आला आहे. (Raj Thackeray)



अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी झाला. या दाम्पत्याला यापूर्वी कियान हा मुलगा आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलीचे आगमन झाले आहे. अमित ठाकरे दुसऱ्यांदा वडील झाल्याने ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित ठाकरे हे मनसेच्या राजकारणात सक्रिय असून, २०२४ची विधानसभा निवडणूक त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. उबाठा गटाच्या महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातून विजय मिळवला होता. अमित ठाकरे यांच्या प्रचारात मिताली बोरुडे यांनीही सहभाग घेतला होता. (Raj Thackeray)



दरम्यान, अमित ठाकरे हे अलीकडेच पुण्यातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कार्यक्रमामुळे चर्चेत आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सध्या राजकीय चर्चांपासून दूर त्यांच्या कुटुंबात आलेल्या या गोड बातमीमुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (Raj Thackeray)

Comments
Add Comment

Vishakha Raut : उबाठाच्या विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर

Recruitment Exam : भरती परीक्षांमध्ये मोठ्या सुधारणा होणार? सरकारचा उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यभर उमेदवारांशी थेट संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे

BEST Bus Accident : वरळीत सिग्नलवर काळाचा घाला! टॅक्सीतून उतरताच BEST बसच्या.....अन् काही सेकंदांतच अनर्थ!

मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Silver Oak Meeting : मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा