BEST Bus Accident : वरळीत सिग्नलवर काळाचा घाला! टॅक्सीतून उतरताच BEST बसच्या.....अन् काही सेकंदांतच अनर्थ!

मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. टॅक्सीतून उतरत असतानाच BESTच्या वेट-लीज बसच्या डाव्या मागील टायरच्या संपर्कात आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे काही क्षणांतच सिग्नलवरील वाहतूक परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, वनमाला आर. साबळे या महिला टॅक्सीतून प्रवास करत होत्या. बसच्या बाजूला टॅक्सी थांबलेली असताना त्या त्यातून उतरत होत्या. त्याच वेळी सिग्नल हिरवा झाला आणि बायकुल्ला स्टेशनहून लोटस जंक्शनच्या दिशेने जाणारी BEST बस पुढे निघाली. याच वेळी महिला बसच्या डाव्या मागील बाजूच्या टायरच्या संपर्कात आल्याचे अपघात अहवालावर आधारित वृत्तांतात नमूद करण्यात आले आहे.



या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बसच्या कंडक्टरने तातडीने त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले. ही बस वेट-लीज ऑपरेटरकडून चालवली जात होती, तर बसमधील कंडक्टर BESTचा कायमस्वरूपी कर्मचारी असल्याची माहिती BESTच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेनंतर BESTचे संबंधित अधिकारी, अपघात नियंत्रण पथक, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच वेट-लीज ऑपरेटरचे प्रतिनिधी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले.



दरम्यान, या अपघातामागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे. चालकाकडून कोणतीही चूक झाली का, टॅक्सी आणि बसची स्थिती नेमकी कशी होती आणि सिग्नलवरील हालचाली कशा घडल्या, याची माहिती तपासातून समोर येणार आहे. या घटनेने BESTच्या वेट-लीज बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सिग्नलवर बस, टॅक्सी, दुचाकीस्वार आणि पादचारी एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना अधिक काळजी आणि सुरक्षित अंतर राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

School Material Distribution : शालेय साहित्य वाटपावर मोठं स्पष्टीकरण; वह्यांबाबतचा दावा फोल

शालेय वस्तूंच्या वाटपावरून विरोधकांचा फेल नॅरेटिव्ह सर्व साहित्यांचे वाटप शाळांमध्ये अंतिम

Vishakha Raut : उबाठाच्या विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर

Recruitment Exam : भरती परीक्षांमध्ये मोठ्या सुधारणा होणार? सरकारचा उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यभर उमेदवारांशी थेट संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे

Raj Thackeray : राज ठाकरे झाले दुसऱ्यांदा आजोबा

- अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज