ऑस्ट्रेलियाची खास वैशिष्टय़े आणि वेगळेपण या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केले जाते. दूरदृष्टीने आणि काळाशी सुसंगत अशा लवचिक योजनांमुळे पर्यटन क्षेत्रातल्या आजच्या वाढत्या स्पर्धेत हा कार्यक्रम दीर्घकाळ यशस्वी ठरेल आणि जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करत राहील.
>> ओलांडला ३ लाखांचा आकडा
>> २०१७ मध्ये ३,०२,२०० भारतीयांची ऑस्ट्रेलियाला भेट
>> २०२० साठी बांधलेल्या अंदाजाला समर्पक आकडा
ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (एबीएस) च्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियात येणा-या भारतीय पर्यटकांनी तीन लाखांचा आकडा ओलांडला, जो मागील वर्षाच्या आकडेवारीहून १५.४% जास्त आहे. २०२० पर्यंत ऑस्ट्रेलिया हे भारतीय पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरावे, यासाठी २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याने दूरदृष्टीने योजना आखल्या होत्या. या योजनेनुसार ठरवलेला ३ लाख हा आकडा मुदतीपेक्षा ३ वर्षे आधीच गाठला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनव्यवस्थेला बळकटी देणा-या देशांमध्ये भारताचा क्रमांक ८वा आहे आणि सलग चौथ्या वर्षी या टक्केवारीत शेकडा दोन आकडी वाढ झालेली आहे.
‘देअर इज नथिंग लाईक ऑस्ट्रेलिया’या ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याने चालवलेल्या कार्यक्रमामुळे ऑस्ट्रेलिया हे जगभरातल्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. ऑस्ट्रेलियाची खास वैशिष्टय़े आणि वेगळेपण या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केले जाते. दूरदृष्टीने आणि काळाशी सुसंगत अशा लवचिक योजनांमुळे पर्यटन क्षेत्रातल्या आजच्या वाढत्या स्पर्धेत हा कार्यक्रम दीर्घकाळ यशस्वी ठरेल आणि जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करत राहील. ऑस्ट्रेलियातली खाद्यपेय संस्कृती, जलक्रीडांचे प्रकार, स्वच्छ समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग आणि वन्यजीवन हे खास पैलू या कार्यक्रमाद्वारे जगासमोर आणले जातात. एकात्मिक आणि सबळ जाहिरात मोहीम, डिजिटल मीडियावर दिलेला वाढीव भर, सशक्त जागृती मोहिमा, कल्पक कंटेंट इंटिग्रेशत प्रकल्प, महत्त्वाचे वितरक आणि एअरलाईन भागीदारांसोबतच्या मोक्याच्या भागीदारी आणि एअरलाईन मार्केट प्लेससारखे या क्षेत्रात पहिल्यांदाच सुरू केलेले उपक्रम यामुळे चोखंदळ प्रवाशांमध्ये ऑस्ट्रेलिया हे एक प्राधान्यक्रमाचे आरामदायी पर्यटन स्थळ बनले आहे.
या महत्त्वाच्या यशाविषयी आनंद व्यक्त करताना श्री. निशांत काशीकर, कंट्रीमॅनेजर, टूरिझम ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि गल्फ म्हणाले, ‘३ लाखांचा आकडा पार केल्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि यासाठी आम्ही आमचे सगळे भागीदार आणि इतर संलग्न संस्थांचे आभारी आहोत. पर्यटनक्षेत्रातल्या काही अद्वितीय क्षणांचे ऑस्ट्रेलिया हे माहेरघर आहे आणि भारतीयांच्या मनात हा लौकिक सतत रुजत आहे. हा लौकिक कायम राखण्यासाठी पर्यटककेंद्रित अशा प्रकारचे अत्यंत सुसूत्रसंशोधन, नवनवीन कल्पना आणि प्रकल्प उभारले जात आहेत. २०२५पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच पर्यटन-भागीदार देशांमध्ये स्थान मिळवणे हे आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी आमचे अथक परिश्रम सुरूच राहतील.’
२०१७ च्या अध्र्या टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या सीमावर्ती स्थलांतर विभागाने भारतीय पर्यटकांकडून व्हिसाचे अर्ज ऑनलाईन स्वीकारणे सुरू केले. ऑस्ट्रेलियाच्या यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज हा एक अत्यंत सुलभ मार्ग आहे. सुट्टय़ांचे आणि प्रवासाचे पूर्वनियोजन करणे आजच्या युगात अत्यंत गरजेचे असल्यामुळे ही सुविधा पर्यटकांना निवडीचे जास्त स्वातंत्र्य देते. यामुळे ऑस्ट्रेलियात येणा-या भारतीय पर्यटकांचा ओघ वाढणार आहे हे निश्चित.