अर्थसंकल्पाला महिना बाकी असताना अर्थमंत्र्यांनी कर सुधारणा आणि जलद निर्णय प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली- अर्थसंकल्पाला महिना बाकी असताना अर्थमंत्र्यांनी कर सुधारणा आणि जलद निर्णय प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. धोरण स्थिरतेची खात्री यामुळे मिळेल, असे म्हटले आहे.
तसेच करदात्यांबरोबर सौजन्य राखण्याचे आवाहन करतानाच करचुकवेगिरी करणा-यांसाठी विशेष धडक मोहीम उघडण्याचे आदेश केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिका-यांना दिले.
दरम्यान, उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे महसूलवाढ आव्हानात्मक ठरत असली तरी या क्षेत्रातील स्थिती सुधारत आहे. हा बदल एवढा उत्साहवर्धक आहे की आम्ही या वर्षीचे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठू शकू, असे अरुण जेटली यांनी सांगितले.