गुजरातमध्ये २००२मध्ये झालेली दंगल रोखण्यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे अपयशी ठरल्याची टीका भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) शनिवारी केली.
नवी दिल्ली – गुजरातमध्ये २००२मध्ये झालेली दंगल रोखण्यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे अपयशी ठरल्याची टीका भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) शनिवारी केली. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन नवी दिल्लीत सुरू आहे. त्या वेळी पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यांनी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी विकासाबाबत कितीही बोलत असले तरी त्यांना २००२ची दंगल रोखता आली नाही, असे त्यागी म्हणाले. भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा. त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असेही त्यांनी सांगितले. लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीला आम्ही विरोध करणार नाही, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.