शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात १९ वर्षीय तरुणाने आपल्याच नातेवाईकाचा खून केल्याचा प्रकार तलासरीत घडला आहे.
ठाणे- शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात अरविंद गोजी जावली या १९ वर्षीय तरुणाने आपल्याच नात्यातील जानू धाजी धोडीया (४३) यांना काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघेही नातेवाईक असून एकाच गावात रहातात. मंगळवारी रात्री ते दोघेही दारुच्या नशेत शुल्लक कारणावरुन भांडत होते. अखेर रागाच्या भरात अरविंदने जानू यांना काठीने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या मुलाने तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अरविंदला खूनाच्या गुन्ह्याखाली अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सुनील गावकर यांनी सांगितले.