बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि पटकथालेखक अभिजीत जोशी यांनी बुंदुरास्थित मेलबर्न विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उपस्थित चारशेहूनही अधिक नागरिकांबरोबर खुला संवाद साधला. ‘संजू’च्या कलाकारांबरोबर खुला संवाद साधल्यानंतर मेलबर्नमध्ये भारतीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला. ‘ला ट्रोब’मधील हिंदी भाषा, सिनेमा आणि साहित्याचे प्राध्यापक डॉ. इ यान वूलफोर्ड यांनी या आयोजनाचे नेतृत्व केले.
हिरानी यांनी विद्यापीठाचे आभार मानताना म्हटले की, ‘‘विभिन्न प्रकारच्या आणि मानवी संबंधांवर आधारित चित्रपटांमध्ये एवढी रुची घेतलेली अनुभवायला मिळाल्याचा अनुभव अवर्णनीय असतो. ‘ला ट्रोब’मध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष प्रदर्शनामध्ये मला हजर राहण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.’’