लेखक हा साहित्यिक असतो. त्याने साहित्याची भूमी नांगरत राहावी, असे आवाहन १६ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात प्रसिद्ध नाटककार तथा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांनी केले. यावेळी देशात निर्माण झालेल्या असहिष्णुतेवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
मुंबई – लेखक हा साहित्यिक असतो. त्याने साहित्याची भूमी नांगरत राहावी, असे आवाहन १६ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात प्रसिद्ध नाटककार तथा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांनी केले. यावेळी देशात निर्माण झालेल्या असहिष्णुतेवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत आणि ते धार्मिकही आहेत. या धर्मात नाना पंथाचे लोक असून त्यांच्या आहाराच्याही नाना पद्धती आहेत. इथे ईश्वर मानण्याची सक्ती नाही नि पूजेची जबरदस्ती नाही. सामान्य माणसांना हे भिन्नत्व मान्य आहे व परस्परांच्या चालीरीती एकत्र ठेवून ते नांदतात. मग, त्यांच्यावर एकच एक राम मानण्याची सक्ती का, असा सवालही जयंत पवार यांनी उपस्थित केला.
धर्म सुधारणावाद्यांना धर्मद्रोही का ठरवले जाते?
सर्वसमावेशकता हे हिंदूचे वैशिष्ट पुसून वैदिक धर्म लादण्याचा अट्टहास का? हिंदू धर्माची लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम सुधारणावाद्यांनी केले आहे, सनातन्यांनी नव्हे. ही लवचिकताच आज निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारवर टीका करणा-या साहित्यिक आणि कलावंतांना तीच भीती आहे. त्यांचे इतकेच म्हणणे आहे की आम्हाला भयमुक्त वातावरण द्या, असेही पवार म्हणाले.
‘कोमसाप’च्या साहित्य जत्रेचे शानदार उद्घाटन
कोकण मराठी साहित्य संमेलाचे उद्घाटन मुंबईतील ‘कोमसाप’चे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत झाले. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस हे संमेलन रंगणार आहे. ‘दादर’च्या हिंदू कॉलनी परिसरातील राजा शिवाजी विद्यालयात भरवण्यात आलेल्या या संमेलनाच्या व्यासपीठाला प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठ असे नाव देऊन प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालन, वसंत काणेकर ग्रंथदालन, आचार्य अत्रे कलादालनाचेही उद्घाटन करण्यात आले.
या साहित्य संमेलनाची सुरुवात शिवाजी पार्क येथे ‘श्री सिद्धिविनायक न्यास अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते उद्यान गणेश पूजन करून झाली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनाचे उद्घाटन सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. वसंत काणेकर ग्रंथदालनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर आचार्य अत्रे कलादालनाचेही उद्घाटन सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळय़ाची सुरुवात खास कोकणी गीताने झाली.
यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष शशिकांत साखळकर, संमेलनाध्यक्ष जयंत पवार, मावळते अध्यक्ष अशोक नायगांवकर, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.‘कोमसाप’चे माजी अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी साहित्य हे परिवर्तनाचे साधन आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी ‘झपूर्जा’ या साहित्य संमेलन विशेषकांचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. तर ‘निवडक झपूर्जा’ चेही उद्घाटन यावेळी स्वागताध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. ‘कोमसाप’च्या कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रह ‘सहृदा’चे प्रकाशन संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ना. पेंडसे स्मृती नाटय़लेखन स्पर्धेतील विजेते नाटककार किरण येले यांना संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी‘साहित्य मित्र’ हा पुरस्कार पर्यटन सम्राट केसरीभाऊ पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिक्षण तज्ज्ञ शरद पाटील, सहकार ऊर्जा शोभाताई सावंत, खोपोलीचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या ‘सहित्य मित्र’ पुरस्कारानंतर भगवान निळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘तुतारी’ हे कविसंमेलन पार पडले.
यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष शशिकांत साखळकर, संमेलनाध्यक्ष जयंत पवार, मावळते अध्यक्ष अशोक नायगांवकर, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.‘कोमसाप’चे माजी अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी साहित्य हे परिवर्तनाचे साधन आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी ‘झपूर्जा’ या साहित्य संमेलन विशेषकांचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. तर ‘निवडक झपूर्जा’ चेही उद्घाटन यावेळी स्वागताध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. ‘कोमसाप’च्या कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रह ‘सहृदा’चे प्रकाशन संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ना. पेंडसे स्मृती नाटय़लेखन स्पर्धेतील विजेते नाटककार किरण येले यांना संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी‘साहित्य मित्र’ हा पुरस्कार पर्यटन सम्राट केसरीभाऊ पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिक्षण तज्ज्ञ शरद पाटील, सहकार ऊर्जा शोभाताई सावंत, खोपोलीचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या ‘सहित्य मित्र’ पुरस्कारानंतर भगवान निळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘तुतारी’ हे कविसंमेलन पार पडले.