दहा दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकांना उत्साहाचे भरते आले होते. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या गणेशोत्सवाचे हे दहा दिवस म्हणजे समारंभप्रिय मराठी माणसाला एक पर्वणीच वाटते.
दहा दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकांना उत्साहाचे भरते आले होते. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या गणेशोत्सवाचे हे दहा दिवस म्हणजे समारंभप्रिय मराठी माणसाला एक पर्वणीच वाटते. हा गणेशोत्सव निर्वघ्निपणे पार पडला.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांच्या संदर्भात मोठे चिंताजनक संकेत मिळाले होते. तसे दर गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमांवर विशेषत: मुंबईतल्या कार्यक्रमांवर दहशतवादी कारवायांचे सावट असते. पण यंदा विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे घातपाती कारवाया करून महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवून, निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
गणेशचतुर्थीच्या आधी गुप्तचर यंत्रणेचा तसा एक अहवाल प्राप्त झाला होता. तसे तर मुंबई हे शहर कायमच दहशतवादी कारवायांच्या राडारवर आहे. त्यातच गेल्या आठवडयात ‘अल कायदा’ या संघटनेच्या एका म्होरक्याने भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर आता ‘अल कायदा’ या संघटनेने भारतावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असल्याची एक ध्वनिचित्रफित केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. म्हणूनच गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेश विसर्जनाच्या काळात तर रस्त्यावर प्रचंड जनसमुदाय उतरलेला असतो, पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही गर्दीला आवरणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना आणि इतर स्वयंसेवकांनाही शक्य होत नाही. अशावेळी गर्दीचा फायदा घेऊन बॉम्बस्फोट घडवून आणणे दहशतवाद्यांना शक्य असते. गर्दीचा फायदा घेऊन सराईत आणि भुरटे चोर महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरतात. पाकिटे मारली जातात, मौल्यवान वस्तू पळवले जातात. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्ताबरोबर मोक्याच्या जागी सीसीटीव्ही कॅमे-यांची फौजही तैनात करण्यात आली होती.
ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे बंदोबस्तावरचा भार थोडा कमी झाला होता. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी ४७ हजार पोलिसांचा खडा पहारा होता. राज्य राखीव पोलिस दलाच्या दहा तुकडया आणि सीमा सुरक्षा दलाच्या दोन तुकडया असा फौजफाटा तर होताच पण गृहरक्षक दल आणि छात्र सनिक तसेच सामाजिक संस्थांचे कार्यकत्रे यांनासुद्धा तैनात करण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीच्या आधी सराईत गुंड आणि समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.अशा सा-या बंदोबस्तामुळे विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली. कुठेही शांततेचा भंग झाला नाही. या गोष्टीबद्दल पोलिसांचे तर अभिनंदन केले पाहिजेत; पण लोकांनीही मोठा संयम दाखवून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.