आशिया चषकातील साखळी लढतीत मंगळवारी गतविजेत्या श्रीलंकेने भारतासमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले. पाच फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या तरी प्रतिस्पध्र्याना ९ बाद १३८ धावाच करता आल्या.
मिरपूर – आशिया चषकातील साखळी लढतीत मंगळवारी गतविजेत्या श्रीलंकेने भारतासमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले. पाच फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या तरी प्रतिस्पध्र्याना ९ बाद १३८ धावाच करता आल्या.
पहिल्या १० षटकांत ४७ धावा करणा-या उर्वरित तितक्याच षटकांत आणखी ९१ धावा फटकावल्या. त्याचे श्रेय चामरा कपुगेदरासह (३२ चेंडूंत ३० धावा), मिलिंदा सिरिवर्धना (१७ चेंडूंत २२ धावा) तसेच तळातील थिसरा परेरा (६ चेंडूंत १७ धावा) आणि नुवान कुलसेकराला (९ चेंडूंत १३ धावा) जाते.
आशिष नेहरासह हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा या मध्यमगती त्रिकुटाने श्रीलंकेची आघाडी फळी मोडीत काढली. अनुभवी नेहराने सलामीवीर दिनेश चंडिमलला (४) कर्णधार महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले. पुढच्याच षटकात बुमराने ‘वनडाऊन’ स्नेहन जयसूर्याला (३) माघारी धाडले. दिलशानने (१८) कपुगेदरासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पंडय़ाने त्याच्यासह कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला (१८) बाद करताना श्रीलंकेला अडचणीत आणले.
११व्या षटकातील ४ बाद ५७ धावा अशा बिकट अवस्थेतील श्रीलंका संघ शंभरी गाठेल किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र सिरिवर्धना, परेरा आणि कुलसेकराने मिळून ५२ धावांची भर घालताना श्रीलंकेला १३८ धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. सिरिवर्धना आणि परेराने प्रत्येकी एक षटकार ठोकला.
भारतातर्फे जसप्रीत बुमरासह हार्दिक पंडय़ा तसेच ऑफस्पिनर आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र अचूक मारा करण्यात सर्वच गोलंदाजांना अपयश आले. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (२-०-१९-०) महागडा ठरला. त्याच्या वाटय़ाच्या दोन ओव्हर्स युवराज सिंग आणि सुरेश रैनाने टाकल्या.