मराठी साहित्य समृद्ध आहे. ते अक्षय्य टिकवण्यासोबतच ते इतर भाषांत अनुवादाच्या रूपाने जाणे आवश्यक आहे.
पिंपरी- मराठी साहित्य समृद्ध आहे. ते अक्षय्य टिकवण्यासोबतच ते इतर भाषांत अनुवादाच्या रूपाने जाणे आवश्यक आहे. विशेषत: मराठी साहित्यात खालच्या वर्गातून आलेले साहित्य खूप महत्त्वपूर्ण व त्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासारखे आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी संमेलन समारोप सोहळयात मराठी साहित्याचा गौरव केला.
ही भाषा फारच समृद्ध असून अनुवादातून ती दुस-या भाषेत जावी व इतर प्रादेशिक भाषेतील सकस साहित्यही त्याच पद्धतीने मराठीत यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी मंत्री विनय कोरे,स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.