>> महिलांना आरोग्याच्या समस्या, ताण- तणाव, नैराश्य अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये असणा-या तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा सकाळी किंवा सूर्यास्था समयी घालावी. प्रदक्षिणा घालताना देवाचे नामस्मरण करावे. पायात चप्पल घालू नये. अशा प्रदक्षिणा नित्य नियमाने घातल्यामुळे आपल्याला आरोग्य व मन:शांती नियमित लाभते.
>> घराच्या मुख्य उंब-याला सोमवारी किंवा गुरुवारी पाण्यामध्ये हळद कालवून त्या हळदीचा लेप घराच्या मुख्य दरवाजाच्या लाकडी उंब-यास लावावा आणि दरवाजाच्या बाहेर हळद-कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि दारात सुंदर रांगोळी काढावी, यामुळे सुख-समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य घराला लाभते व भाग्योदय होतो.
>> आपल्या घराच्या आतील व बाहेरील वातावरण पवित्र, सात्त्विक व शुद्ध असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीचे मन विचार आणि कृती चांगली व सकारत्मक राहते आणि त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक टप्यावरती आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज नेहमी लागते, त्यामुळे आपले घर शुद्ध व सकारात्मक असले की आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सकारात्मक होतात म्हणून योग्य वास्तुतज्ज्ञाच्या सल्याने वास्तू कन्सल्टिंग करून घेणे महत्त्वाचे आहे.
>> घरामध्ये कार, टू-व्हिलर पार्किंग करताना ईशान्य दिशेमध्ये पार्किंग करू नये. आग्नेय, नैऋत्य, वायव्येला पार्किंग केले तरी चालेल. कार व टू-व्हिलर पार्किंग करताना गाडीचे तोंड उत्तर-पूर्व किंवा ईशान्येला तोंड करून गाडी लावावी आणि दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही वाहन लावू नये.
>> घराची ईशान्य दिशा, पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या अतिशय शुभ दिशा आहेत. या दिशांमधून शुभप्रवाह घरामध्ये प्रवाहित होत असतो. या दिशेतील येणा-या शुभ ऊर्जेचा व शुभतत्त्वांचा घरातील सर्वांच्या सुख – समृद्धीसाठी भरपूर उपयोग होतो, त्यामुळे घराच्या ईशान्य दिशेमध्ये कुंचा, केरसुनी, फरशी पुसायचे फडके, जुने सामान व डस्टबिन या गोष्टी ठेवू नयेत. या गोष्टी शुभ दिशांमध्ये आल्यामुळे अशुभ तत्त्व वाढीस लागतात व आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते.
>> नवीन घर घेताना हायवे, ओव्हर ब्रीज, खोल दरी, अनेक वर्षापासून साठवलेले पाण्याचे तळे, पडका किल्ला, पडके बांधकाम, जुन्या मंदिराचे उंच शिखर आणि मोठे हॉस्पिटल अशा गोष्टी नवीन घर घेताना जवळपास नसाव्यात, यामुळे आपल्या घरातील अशुभ तत्त्वाची वाढ होऊन शुभ तत्त्वाची हानी होते आणि त्यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.
>> आपल्या घराच्या, ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ हातात भाला घेतलेल्या माणसाची मूर्ती, तलवार, बंदुका व कोणत्याही प्रकारची शस्त्र घेतलेल्या मूर्ती, पुतळा, चित्रे लावू नयेत. मारलेल्या हरिण किंवा प्राण्यांची तोंडे अशा कोणत्याही अशुभ गोष्टी ठेवू नयेत, त्यामुळे घरामधील व्यक्तींची क्रूर व दुष्ट प्रवृत्ती जागृत होऊन घरामध्ये त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.