द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाऊंटन्ट्स या लेखा व्यावसायिकांच्या जागतिक संघटनेने आपल्या नुकत्याच घेतलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. भारतातील लेखा व्यावसायिकांसमोरील महत्त्वाच्या समस्यांबाबत जनतेचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला. भारतातील १८ वर्षावरील सुमारे १००० लोकांची मते या सर्वेक्षणात घेण्यात आली. हॅरिस पॉल यांनी हे सर्वेक्षण ऑनलाईन पूर्ण केले आहे.
भारतातील लेखा व्यवसायासंदर्भात जनतेच्या दृष्टिकोनाची महत्त्वाची माहिती नव्या सर्वेक्षणातून मिळते. सन २०२७ पर्यंत लेखा व्यावसायिकांची जागा तंत्रज्ञान घेईल असे ७० % भारतीयांना वाटते, तर आपल्या लेखा गरजा पूर्ण करण्यासाठी एकटय़ा अक वर विश्वास ठेऊ शकत नाही, असे ६४ % व्यक्ती सांगतात. नव्याने अमलात आणलेल्या गुड्स अँड सव्र्हिस टॅक्सने भारतातील व्यवसाय समुदाय विस्कळीत झाला आहे, असा ६४ % लोकांचा विश्वास आहे.
तंत्रज्ञान पुढील १० वर्षाच्या काळात नव्याने येणारे तंत्रज्ञान (उदा. ब्लॉकचेन, ऑटोमेशन, आर्टिफिशल इंटेलिजन्स (अक)) लेखा व्यावसायिकांना अप्रचलित बनवून त्यांची जागा घेईल, असे ७० % प्रौढांना वाटते, तर ६४ % लोकांच्या मते आपल्या लेखा गरजा पूर्ण करण्यासाठी ते एकटय़ा अक वर विश्वास ठेऊ शकत नाहीत. प्रथमदर्शनी हे निष्कर्ष परस्पर विरोधी वाटत असले तरी, भविष्यात लेखा व्यावसायिकांना आपल्या ग्राहकांसाठी अधिक धोरणात्मक आणि विेषणात्मक जबाबदारी देऊन, लेखा व्यवसायाच्या परिवर्तनात तंत्रज्ञानाची किती मोठी भूमिका असेल, यावर एकमत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. ‘‘भारत आणि जगभरातील लेखा व्यावसायिकांसाठी हा उत्साहवर्धक काळ आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आणि अक च्या उदयामुळे त्यांची अनेक पारंपरिकरीत्या मॅन्युअल कामे स्वयंचलित होत आहेत,’’ असे द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाऊंटन्ट्सचे अध्यक्ष रॅचेल ग्रिम्स म्हणतात. या मोठय़ा बदलातून लेखा व्यावसायिक काम करीत असलेल्या आपल्या संस्थेसाठी धोरणात्मक सल्ला देणे आणि उत्कृष्ट व्यवसाय मार्गदर्शन पुरविण्यावर भर देण्याची संधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
एसएमईवर प्रभाव
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारे लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) सुमारे ५० दशलक्षपेक्षा जास्त असून सन २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये त्यांचे योगदान सुमारे ५० टक्क्यापर्यंत असेल अशी अपेक्षा आहे. जर आपण एखाद्या व्यवसायाची उभारणी केली तर ते शक्यतो व्यावसायिक लेखपालाचा वापर करतील, असे सुमारे ८० टक्के भारतीय व्यक्तींनी सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग ( एसएमई)या क्षेत्राचा मोठा सहभाग असून भारतातील या लघु उद्योगांची वृद्धी, आर्थिक पारदर्शकता आणि यशासाठी मदत करण्यात लेखा व्यावसायिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ग्रिम्स यांनी सांगितले.
सध्याच्या कर प्रणालीतील विद्यमान आव्हाने सोडविण्याच्या उद्धेशाने, जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. विशेषत: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अप्रत्यक्ष कर निर्मूलन करण्यास, कर प्रणालीत अधिक पारदर्शकता पुरविण्यास, उत्पादन खर्चाचा अनुमान काढणे आणि व्यवसाय विस्तारासाठी नवीन कार्यक्षेत्र सहज प्रवेश अधिक सहज करण्यासाठी जीएसटी मदत करील. गेल्या वर्षातील भारताच्या सर्वात मोठय़ा परिवर्तनाविषयी विचारल्यानंतर, नव्याने अमलात आणलेल्या जीएसटीमुळे देशातील व्यावसायिक समुदाय विस्कळीत झाला असल्याचे ६४ % लोकांचा विश्वास आहे. व्यवसायांना जीएसटीशी सुसंगत राहण्यासाठी, खासकरून, अनुपालन करण्याची इच्छा आणि लेखा व्यवसायातील कुशलता आणि विशेषज्ञता यावरील लोकांच्या विश्वास वाढविणारा, एक ज्ञानी लेखा व्यावसायिक असणे आवश्यक आहे, असे ७४ टक्के लोकांना वाटते.
अफरातफर आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई
खासकरून तांत्रिक जटिलता वाढल्यापासून अफरातफर करण्याच्या अधिक संधी मिळाली असून आजच्या व्यावसायिक वातावरणात संस्थांना सातत्याने भ्रष्टचाराच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, यात काहीच आश्चर्य नाही. देशातील भ्रष्टाचार आणि अफरातफरीविरुद्धच्या लढाईत लेखापाल व्यावसायिकांची फार प्रमुख भूमिका आहे, असा एक तृतीयांश भारतीयांचा विश्वास आहे. लेखा व्यवसायिकांमुळे भारतीय अर्थकारणातील वित्तीय पारदर्शकता सुधारली आहे, असे मत ८० टक्के लोकांनी नोंदविल्याचे सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे.