अंबरनाथ शहरात सध्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. तर काही रस्त्यांची कामे नुकतीच पूर्ण झालेली आहेत.
अंबरनाथ – अंबरनाथ शहरात सध्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. तर काही रस्त्यांची कामे नुकतीच पूर्ण झालेली आहेत. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर २२ ते २७ दिवसांच्या कालावधीनंतर या रस्त्यांचे काम नीट झाले आहे की नाही, यासाठी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ म्हणजेच त्रयस्थ व्यक्तीद्वारे कामाची पाहणी करून अहवाल सादर केला जातो. हे ऑडिट सकारात्मक असेल तरच प्रशासन संबंधित कंत्राटदाराला बिले अदा करू शकते; मात्र काही रस्त्यांच्या कामात कंत्राटदारांना ‘थर्ड पार्टी ऑडिट’ न करताच बिले अदा करण्यात आल्याचा आरोप अंबरनाथ पालिकेतील नियोजन सभापतींनी केला आहे.
गेली १५ वर्षापासून अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मागील वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करून अंबरनाथ शहरातल्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा चंग नगरपालिकेने बांधला आहे. शहरात सिमेंटचे पक्के, कायमस्वरूपी रस्ते होणार असल्याने सुरुवातीला नागरिकांनीही या कामांना पाठिंबा दिला, मात्र नागरिकांच्या पैशातून होणा-या या कामांतही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने नागरिकांत संताप आहे. या प्रकरणात अंबरनाथ पालिकेच्या अधिका-यांनी मनमानी पद्धतीने बिले काढल्याचा आरोप आहे.
या अधिका-यांवर सत्ताधा-यांचा अंकुश नसल्यानेच अधिकारी आणि कंत्राटदारा निर्ढावले असल्याचे बोलले जात आहे. ‘थर्ड पार्टी ऑडिट’ न करता कंत्राटदारांची बिले कशी काढली, याबाबत आपण मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांच्याकडे माहिती मागवली असून; दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी केल्याचे नियोजन सभापतींनी सांगितले. तसेच मुख्याधिका-यांनी अधिका-यांना पाठीशी घातल्यास आपण जिल्हाधिका-यांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दाद वैगरे काय मागताय….सरळ लोकांनी उतायचे आणि तय्ना नागडे करून चोप डायचा भर चौकात….!!!