समाजात महिलांवर होणारे अत्याचार अजूनही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानसिक, शारीरिक छळ, भेदभाव आदींच्या माध्यमातून स्त्रीयांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर होणा-या अत्याचाराचं केवळ सासर हेच केंद्र नाही, तर मुलीच्या जन्मापासूनच ती नको म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सामाजिकस्तरावर या अत्याचाराला वाचा फोडणे गरजेचे आहे.
दहा लाखांच्या हुंडयासाठी सुनेला जिवंत जाळलं..! कल्याणची घटना. अगदी परवाचीच. अशा स्त्रियांचा मानसिक छळ करणा-या, स्त्रियांवर होणा-या अत्याचाराच्या घटना पाहिल्या की समाजात आपसुकच प्रतिक्रिया उमटतात. पण परिणाम शून्य असतो. अशा घटना या वेगवेगळया स्वरूपाने कालपरत्वे घडतच असतात.
स्त्रीचं मानसिक खच्चीकरण, तिचा सासरी होणारा छळ, पतीचा मनमानीपणा, सासूचा जाच. याशिवाय समाजात स्त्रीला दिलं जाणारं दुय्यम स्थान. आदी अनेक कारणांमुळे स्त्रीवर होणारे अन्याय-अत्याचार हे परिस्थितीलाच मूक बनविणारे आहेत.
नवरा नांदवत नाही.. सासूकडून छळ होतो किंवा काहीही कारण नसताना सासरची मंडळी त्रास देऊन सुनेला माहेरी पाठवून देतात, असे प्रकार ठिकठिकाणी घडत असताना आणि कौटुंबिक अत्याचार कायदा अस्तित्वात असतानाही संसार मोडला. स्त्रीवर अन्याय, अत्याचार झाला तरी साधी तक्रार नोंदवली जात नाही. यावरून गेल्या अनेक पिढया स्त्रियांवर होणा-या अत्याचाराचा अंत होणार का? हा एक अनुत्तरित प्रश्न राहिला आहे.
एखादी घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटतात. मात्र ती घटना घडू नये म्हणून सामाजिक स्तरावर कोणते प्रयत्न केले जातात, या गोष्टीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण आणि शहरीपातळीवर घडणा-या घटनांमध्ये शहरी भागातील महिलांना कायद्याचे ज्ञान असले तरी ग्रामीण भागातील महिलांना कायद्याचे ज्ञान किती आहे आणि जर त्यांना कायद्याचे ज्ञान असले तर त्या त्याचा किती आधार घेतात हा देखील प्रश्न सतावणारा ठरतोच ठरतो.
सामाजिकस्तरावर या अत्याचाराला वाचा फोडणे गरजेचे आहे. महिलांना कौटुंबिक पातळीवर होणारा त्रास, तिचा होणारा छळ, मानसिक कोंडी रोखण्यासाठी विशेषत: शहराबरोबरच ग्रामीण पातळीवर महिलांसाठी विविध संस्थांच्या माध्यमातून कायद्याचा प्रसार होणे गरजेचे आहे.
या घटना रोखण्यासाठी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. घरात अगदी किरकोळ गोष्टीवरून होणारे वादही त्या महिलेच्या त्रासाचे कारण ठरतात आणि तिथूनच या सा-याला अस्पष्टशी सुरुवात होते. नकळतच मग संसाराला गालबोट लागून अत्याचाराला ती स्त्री बळी पडते.
हुंडा घेत नाही, असं म्हटलं जातं. हुंडाबळी कायदाही अस्तित्वात आहे, मग अशा घटना का घडतात? आजही स्त्री या अत्याचाराचा बळी ठरते आहे. समाजात काही सुधारणा घडवून आणायची असेल तर प्रथम मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
महिलांवर होणा-या अत्याचाराचं केवळ सासर हेच केंद्र नाही, तर मुलीच्या जन्मापासूनच ती नको म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मुलगी नको हाच दृष्टिकोन तिच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो. भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी इथेच खरा भेदभाव सुरू होतो.
हा भेदभावापासूनचा प्रारंभ तिच्या पुढील नात्यातही उमटतोच. सासू-सुनेचं नातं असंच काहीसं.. पती-पत्नीच्या नात्यात अहंकार आणि वादाचं स्वरूप निर्माण झालं की या अत्याचाराला वाव मिळतो आणि त्याची बळी सर्वस्वी ही स्त्री ठरते.
खरं तर हुंडा प्रतिबंधक कायदा (१९२९), कौटुंबिक हिंसाचार कायदा (२००५) अस्तित्वात आल्यानंतरही अशा स्त्री अत्याचाराच्या घटना घडतातच आहेत. कुठे बलात्काराच्या घटना, कुठे सुनेला जाळून मारलं, महिलांच्या आत्महत्यांच्या घटना, सुनेच्या छळाच्या घटना, शैक्षणिक केंद्रातही मुलींचा लैंगिक छळ, सार्वजनिक ठिकाणी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कार्यक्षेत्रामध्ये ती अकार्यक्षम म्हणून तिच्याकडे पाहण्याचा कल, कौटुंबिक पातळीवर तिची होणारी मानहानी, तिचा होणारा शारीरिक, मानसिक छळ, शाब्दिक, भावनिक, आर्थिक छळ पाहता जवळजवळ ७० टक्के महिलांना घरगुती छळाला सामोरे जावे लागते. हुंडाबळीच्या घटना डोकं वर काढतात.
आज स्त्रियांनी स्वावलंबी होणं आवश्यक आहे. पण त्यासाठी कौटुंबिक स्तरावरही प्रयत्न आणि प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दिवसागणिक घडताना दिसतात.
त्या रोखण्यासाठी महिलांनी प्रथम स्वत: खंबीर होण्याची गरज आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिचा मानसिक छळ करणे. मारहाण करणे, घटस्फोटाच्या नोटिसा पाठवून हैराण करणे आदी घटना या तिच्या मानसिक खच्चीकरणासाठी कारणीभूत ठरतात.
यातूनच मग या स्त्रिया या समाजात पुढे न येता मग आत्महत्येचा मार्ग निवडताना दिसतात.
कायद्याच्या कचाटयातून सुटण्यासाठी, कौटुंबिक त्रास कायमचा संपविण्यासाठी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतात. सासरच्या छळाला कंटाळून घेतले जाणारे निर्णय हे त्या स्त्रीच्या जीवावर बेतणारे ठरतात आणि यावेळी मग कायदाही हतबल ठरतो.
महिलांवरील अत्याचार रोखणे शक्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर खरोखरंच अनुत्तरित करणारं असलं तरी होकारार्थी दृष्टिकोनातून पाहिले तर त्यासाठी स्त्रीने न घाबरता पुढे येणे गरजेचे वाटते.
तिने स्वत:च सक्षम असणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशन, कायद्याचा आधार घेऊन ती जर पुढे आली तर समाजात घडणा-या अत्याचारांच्या घटनांना आपोआपच पूर्णविराम मिळायला फारसा वेळ लागणार नाही.
भेदभाव टाळला पाहिजे
आजही महिलांमध्ये भेदभाव केला जातो. अगदी किरकोळ कारणांनी संसारामध्ये कुरबुरी वाढतात. हुंडाबळीसारख्या घटना घडतात. घर, संसार, शैक्षणिक, नोकरीच्या ठिकाणी स्त्री किती अकार्यक्षम आहे ते दाखविले जाते.
छळ, अत्याचाराच्या घटनांना पेव येतो. या गोष्टी टाळण्यासाठी महिलांनी पोलीस स्टेशनचा आधार घेणं आवश्यक आहे. पोलीस स्टेशन, कायद्याची जी भीती महिलांच्या मनात आहे ती सर्वप्रथम दूर झाली पाहिजे. महिलांनी स्वत:च योग्य निर्णयावर ठाम राहून समाजात निर्भीडपणे वावरले पाहिजे.
– अॅड. श्वेता कस्तुरे, (मुंबई)
महिलांनी सक्षम व्हावे
खरं तर ग्रामीण भागातील महिला या त्रास, अत्याचार सहन करतात पण घाबरून पुढे येत नाहीत. अशा महिलांपर्यंत कायदा पोहोचवणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींमार्फत सभा, कार्यक्रमांच्या माध्यमातून कायद्याचं ज्ञान ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचविले पाहिजे. कायद्याची जनजागृती होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी केवळ महिलाच नव्हे तर पुरुषवर्गातूनही पुढाकार घेतला गेला पाहिजे.
महिलांवर अत्याचार होण्यामागील अनेक कारणे आहेत. त्यात सामाजिक, आर्थिक कारण हे महत्त्वाचे आहे. आर्थिकरीत्या परावलंबी असणारी स्त्री ही साहजिकच आजही पुरुषप्रधान व्यवस्थेत अनेकांगी भेदभाव आणि अत्याचारांना कळत नकळत बळी ठरत असते. म्हणूनच स्त्रीया या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिकदृष्टया सक्षम होणे आवश्यक आहे.
त्यासाठीच वेगवेगळया माध्यमातून स्त्रियांचा आर्थिक स्तर उंचावणे गरजेचे आहे. या स्त्रिया स्वयंनिर्णयाने विविध क्षेत्रांत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकतात. ही जाणीव ठेवून मी बचत गट असो किंवा स्त्रियांसाठीच्या शासकीय योजनांच्या माध्यमातून स्त्रीयांना सक्षम करण्यावर भर देत आहे. त्यातूनच स्त्रीयांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील सहभाग वाढून त्यांना आत्मसन्मानाची दिशा मिळाली तरच समाजातील स्त्रिया या अत्याचारविरहीत सन्मानपूर्वक आयुष्य जगतील अशी खात्री वाटते.
– सुरेखा बच्छाव, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यां (सटाणा, नाशिक)
Dont be full others
Need to tell how can u stop this
मी शीतल विजय दुर्गे मी जातीने चाम्भार मुळाशी लग्न केले लग्नाला 15वर्षे होऊनही माजे भाऊ संजय वाजा त्याची पत्नी ज्योती वाजा लहान भाऊ शैलेश वाजा हे लोकं मला भरपूर हरिस्मेन्ट आणी मेन्टलि टोचेर करतात ह्यानी…असेच हे दारू पिऊन मला व माज्या परिवाराला जातीवाचक शीव्यगली व मला अश्लील शिव्यगलि करतात ह्यानी मला व माजे पती आमच्यावर प्राणघातक हल्ला केला माजे पती ह्यांच्यावर 19/9/2017 रोजी चॉपर ने वार करून ..त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ..खार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला .त्यात त्याना ..ए पी आई संतोष रासम साहेबानी त्याना कायदेशीर अटक केली नाही..त्याना वी आई पी सवलत देऊन जामिनावर वर बाहेर काढण्यासाठी मदत केली .ह्या कारणाने त्याना पोलीसाची भीती राहिली नाही ..ह्यानी पुनः दारू पिऊन मला दगडाने ठेचून .जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यात मला डोळ्या भोवताली हड्डी मध्ये फक्क्चर आले आहे ..मला ऑपरेशन ची गरज लागणार आहे ..ह्या सर्व गोष्टी साठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ..रामचंद्र जाधव साहेबाना आम्ही ..वारम्वर भेटून सुध्दा आम्हला जीवाला धोका आहे ..हे हमेशा दारू पिऊन आमच्या जातीचा अपमान करतात चाम्भारा घाट्या अशी शब्द बोलून जातीवाचक शीवगाली करतात ..हया करिता मी माजे मेडिकल रिपोर्ट घेऊन खार पोलीस ठाण्यात गेली नाही ..कारण आम्हाला ..वरिष्ठ पोलीस निरीक्षक ..रामचंद्र जाधव साहेब ह्यांचा वर विश्वास नाही ..आम्ही इतके वेळा साहेबाना भेटलो ..आमच्या जीवाला धोका आहे ही वीनवणी करून सुध्दा ..ह्या वर बारकाईने लक्ष दिले नाही ..काही लोकांच्या वशिल्याने त्यानी आम्हाला दुर्लक्ष केले ..ह्या मुले ..आमच्यावर पून्हा पून्हा प्राणघातक हल्ले होतात ..ह्यावर लक्ष दिले नाही तर पुन्हा आमच्या जिवाला धोका आहे ..आम्ही आठ महिन्यापासून वरिष्ठांना लेखी अर्ज देत आहे ..तरीही आमच्यावर जातीवाचक प्राणघातक हल्ले होत आहे ..कारण ह्याना पोलीसंचि साथ आहे …ह्याना कुठल्याच प्रकारची भीती नाही..आपण मला व माज्या परिवाराला सहकार्य करावे …अशी मी आपल्या कडे मदतीची साथ द्यावी ह्या करिता तक्रार करत आहे…..