म्हाडातर्फे राबवण्यात येणा-या ‘माझी मुंबई निर्मळ मुंबई’ या मोहिमेचां शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.
मुंबई – म्हाडातर्फे राबवण्यात येणा-या ‘माझी मुंबई निर्मळ मुंबई’ या मोहिमेचां शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. धारावीच्या संत कक्कया मार्गावरील शिवराज चौकातून ही मोहीम सुरू झाल्याचे या वेळी चव्हाण यांनी जाहीर केले.
सचिन तेंडुलकर या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ही मोहीम वर्षभर चालणार असून त्यासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धारावीतल्या गणेश विद्यालयात मुंबईतल्या पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतल्या ५०० शाळांत अशी टॉयलेट्स उभारली जाणार आहेत.
म्हाडाच्या माध्यमातून ‘माझी मुंबई निर्मळ मुंबई’ हे अभियान राबवले जाणार आहे. ग्रामीण भागात हीच मोहीम यशस्वीपणे राबवल्याची माहिती या वेळी चव्हाण यांनी दिली. राज्यातील अनेक तालुके, जिल्हे निर्मल झाले आहेत. यात कोल्हापूर जिल्हा सरस ठरला आहे.
ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही यशस्वी केली जाईल. मुंबई सुंदर करण्यासाठी याआधीही अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम आहे. महात्मा गांधींनी सुंदर भारत निर्माण करण्याचा संदेश दिला होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन ही मोहीम पुढे जाईल. या मोहिमेला नागरिकांनीही सहकार्य करावे.
आपण राहात असलेला परिसर सर्वानी मिळून कसा स्वच्छ ठेवता येईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन ही चव्हाण यांनी या वेळी केले. दरम्यान, राजीव गांधी जीवनदायी योजना अधिक व्यापक करणार असल्याचे या वेळी त्यांनी जाहीर केली. इंदिरा गांधी यांचे गरिबी हटावचे स्वप्न पुढे न्यायचे आहे. भविष्यात त्यांचे हे स्वप्न साकार करू, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय ,श्रीमती ,इंदिरा गांधींचे ” गरिबी हटाव ” चे स्वप्न पुढे न्यायचे आहे ,भविष्यात त्यांचे हे स्वप्न साकार करू ,म्हणजे
कोणत्या वर्षी ????? कारण आता स्व .श्रीमती ,इंदिरा गांधीना जावून ३०, वर्षे लोटलीत ,हे,श्री ,चवाण साहेब ,आणि ,श्री,तेंडूलकर साहेब,यांना ठाउक आहेच .