धार्मिक उन्माद कमी झाल्यास भारताचा वेगाने विकास होईल, असे सांगून हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या ‘घर वापसी’वर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी अप्रत्यक्ष टीका केली.
नवी दिल्ली – धार्मिक उन्माद कमी झाल्यास भारताचा वेगाने विकास होईल, असे सांगून हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या ‘घर वापसी’वर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी अप्रत्यक्ष टीका केली.
अमेरिका भारताचा सर्वात चांगला मित्र बनू शकतो. भारत-अमेरिका एकत्र आले तर जग अधिक सुरक्षित होईल. दोन्ही देशांनी दहशतवादाची झळ सोसली असून, दोघांसमोरही आता नवी आव्हाने आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ओबामा यांनी केले.
तीन दिवसांच्या दौरा आटोपता घेताना ओबामा यांनी येथील सिरी फोर्ट सभागृहात जात, धर्म, वर्ण, महिला सबलीकरण आणि भारत-अमेरिका संबंध या सर्व मुद्दय़ांवर ओबामांनी आपले विचार मांडले. भारतीयांना धार्मिक स्वातंत्र देणाऱ्या घटनेच्या पंचवीसाव्या कलमाचाही ओबामा यांनी विशेष उल्लेख केला.
भारत-अमेरिका नागरी अणुऊर्जा करारातील अडथळे दूर करून, आता आपण अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे भारतीयांची विजेची गरज पूर्ण होऊ शकेल, असे ते म्हणाले.
भारत-अमेरिका वेगवेगळय़ा क्षेत्रात एकत्र काम करू शकतात. भारत-अमेरिका विविध आजारांवर लसींची निर्मिती करून, बालमृत्यू रोखण्यात महत्त्वपूर्ण काम करू शकतात. अलीकडच्या काही वर्षात अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक गरिबी निर्मूलन झाले आहे. स्त्री सबलीकरणावरही जोर दिला. प्रजासत्ताक दिनी भारतीय सन्य दलातील संचालनाचे महिलांनी जे नेतृत्व केले त्याचे ओबामांनी कौतुक केले.
मुलाप्रमाणेच प्रत्येक मुलगीही महत्त्वाची आहे. मुली यशस्वी होते तेव्हाच देश यशस्वी होतो, असे ओबामा म्हणाले. जात, धर्म, पंथ आणि वर्ण यामध्ये न अडकता मानवतेला महत्त्व देण्याचा सल्ला त्यांनी दिला. अमेरिकेत माझ्या आयुष्यातही असे काही क्षण आले जिथे आपल्या रंगामुळे वेगळी वागणूक मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाहरुख खान, मेरी कोम, मिल्खा सिंग यांचा धर्म, रंग न पाहता त्यांचे यश सर्व भारतीयांनी सारखेपणानेच साजरे करावे असे ओबामा म्हणाले.
कॉँग्रेसचा मोदी यांना टोला
ओबामा यांचे ऐकून तरी मोदी यांनी संघ परिवाराला ‘घरवापसी’सारखे कार्यक्रम थांबवायला सांगावे, अशी जोरदार टीका कॉँग्रेसने केली.
का नाही प्रयत्नांती परमेश्वर हि म्हण चूक नाही… चीन, पाकिस्तान यांनी आपल्याला काय दिले.. दुख आणि तोटा.. आता वेळ आली आहे.. आता संपूर्ण देशाला कळू द्या.. एका हाती सत्ता दिली तर काय फायदा आहे ते…