Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमध्यंतरसुखदानाव ठेवावे का?

नाव ठेवावे का?

आपण जन्माला येतो ते निव्वळ एक बाळ म्हणून, आपलं नाव आपल्याला ओळख मिळवून देतं. कुठल्याही मुलीच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असलेलं, प्राणपणाने जपलेलं, कुणी प्रेमाने ठेवलेल्या टोपणनावाचं मूळ असलेलं नाव एका झटक्यात केवळ लग्न झालं म्हणून तिची मर्जीही न जाणून घेता बदलून टाकणं, अशा विचित्र प्रथा आपल्याकडच्या लग्नांमध्ये का असतात, याचं उत्तर कदाचित कुणाकडेही नसावं..

माझ्या या सदरातल्या पहिल्या म्हणजेच गेल्या गुरुवारच्या लेखाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम वाचकांचे खूप खूप आभार! माझा तो लेख वाचून माझी आई खूपच भावूक झाली होती. मी माझ्या नावात दोन्हीकडची आडनावं लावली या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं. त्यावर मी तिला म्हटलं की, हे तर स्वाभाविकच आहे कारण जर तुम्ही मला लिहायला-वाचायला शिकवलंच नसतं तर मी कधी हा लेख लिहूच शकले नसते. तिला आणि बाबांना मात्र माझ्याकडून अगदी सहज घडलेल्या या कृतीचा खूप अभिमान वाटला. तिच्याशी झालेल्या त्या संभाषणानंतर एका गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव झाली,आपण कितीही म्हटलं की ‘नावात काय आहे’ तरी आपलं नाव हा आपल्या अस्तित्वाचा सर्वात मोठा घटक असतोच. आपल्याकडे लग्नातही नाव या विषयाशी निगडित अनेक गमतीजमती असतात. म्हणजे नाव घेणं, बायकोचं नाव बदलणं, नव-याला नावाने हाक मारणं ते अगदी ‘नावं ठेवणं’, सगळ्यातच नावाची भूमिका मोठी! नावात काय आहे हे खरं तर या वेळी उमगतं.

जेव्हा माझं नाव लग्नानंतर बदलण्याचा विषय समोर आला तेव्हा मी त्याला सपशेल नकार दिला होता. सुदैवाने त्यासाठी मला कुणाची मनधरणी करावी लागली नाही की जीवाचा आटापिटा करावा लागला नाही. माझ्या विचारांचा माझ्या नव-याने आणि सासरच्यांनी आदर केला आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्या जन्मानंतर कौतुकाने सोहळा करून ठेवलेलं माझं नाव कायम राहिलं. एकदा माझ्या नव-याने मला ‘काय हरकत आहे नाव बदलायला’ असं गमतीने विचारलं. त्यावर मी त्याला इतकंच म्हटलं की ‘मुलीचं लग्नात नाव बदलण्यामागचं एक तर्कशुद्ध कारण तू मला दे आणि खुशाल माझं नाव बदल.’ त्यानंतर पुन्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा मी त्याला विचारलं की ‘आता, तुझ्या वयाच्या २८व्या वर्षानंतर मी अचानक एक दिवस तुझं नाव बदललं तर तुला कसं वाटेल?’ मला आठवतं, त्या दिवसानंतर आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नाही. एवढंच काय, तर लग्नाच्या वेळी जेव्हा ‘काय नाव ठेवणार रे!’ अशी त्याच्या नातवाईकांकडून विचारणा झाली तेव्हा तो परस्परच कशाला बदलायचं नाव, हे नाव चांगलंच आहे असं म्हणू लागला. याचाच अर्थ माझं म्हणणं त्याला पटवून देण्यात मी शंभर टक्के यशस्वी झाले होते.

लग्नात मुलीचं नाव बदलण्यामागचं तर्कशुद्ध कारण आपल्यापैकी कुणालाच माहीत नसावं. पूर्वापार एखादी पद्धत चालत आली आहे म्हणून एखादी गोष्ट करायची, याला खरं तर काहीच अर्थ नाही. ज्या नावाने मुलीच्या अस्तित्वाला पहिल्यांदा ओळख मिळाली ते नाव बदलणं म्हणजे तिचं लग्नाआधीचं अस्तित्वच नाकारण्यासारखं नाही का? कदाचित ही पद्धत सुरू होण्यामागचं कारणही हेच असेल. कारण आपल्या समाजव्यवस्थेत मुलीने नवीन आयुष्याची सुरुवात करताना सहसा तिच्या संपूर्ण भूतकाळाची लग्नाच्या होमकुंडात आहुती द्यायची अशी पद्धत आहे, त्यात नावही आलंच.

काही जणींना ही काही फार मोठी गोष्टच नाही, असं वाटतं, पण मैत्रिणींनो, आपला जन्म झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांनी किती कौतुकाने अनेक नावांचे अर्थ शोधत, काही नावांवरून एकमेकांशी वाद घालून मग कुठे एक नाव आपल्यासाठी ठरवलं असेल. अत्यंत प्रेमाने, धुमधडाक्यात बारसं करून आपल्याला हे नाव दिलं असेल. आपण आजवर कमावलेली सगळी प्रशस्तीपत्रकं, बक्षिसं एवढंच काय तर मोबाइल, इंटरनेटचं बिल आणि अगदी बँकेतलं खातंदेखील ज्या नावावर आहे, ते नाव अचानक कुणीतरी केवळ आपल्यावर स्वत:चा हक्क प्रस्थापित करण्यासाठी म्हणून बदलत असेल तर ते योग्य नाही. मुळात आपली ओळख परस्पर बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही.

आता हा लेख वाचणा-या अनेक काकूंना हे आगाऊपणाचं वाटत असेल खरं, पण निदान माझं नाव बदलण्याचा विषय झाला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे सारे विचार आले होते. अगदी असंच प्रत्येकाला वाटावं हे काही गरजेचं नाही. कुणी सांगावं, काही जणींना कदाचित त्यांचं नाव आवडतही नसेल आणि निदान लग्नाच्या निमित्ताने ते बदलतंय म्हणून त्या खूशही होत असतील. आडनावाचंही थोडय़ाफार प्रमाणात तसंच आहे, पण आपण एका नवीन कुटुंबाचा भाग होत असताना त्यांची ओळख आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला ती आपल्याकडून मिळण्यासाठी सासरकडचं आडनाव स्वीकारायलाच हवं. परंतु माझ्या मते, त्यासाठी माहेरच्या आडनावाचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नाही. लग्न म्हणजे आपल्याला विधी, कपडे, आमंत्रणं, दागिने, नवं घर असं सगळं वरवरचंच वाटत असतं, पण खरं तर लग्न या सगळ्याहून खूप वेगळा, असा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा, अनुभवांचा, नव्या-जुन्या विचारांचा आणि प्रथांचा एकत्रित सोहळा असतो.

मुलीला एकीकडे आईबाबांचं घर सोडून जायचं म्हणून वाईट वाटत असतं आणि दुसरीकडे नव्या घरात सासू-सासऱ्यांना, नव-याला हाक काय मारायची, इथपासून सगळे प्रश्न पडलेले असतात. मी तर सासू-सासऱ्यांना लग्न ठरल्यापासूनच आई-बाबा बनवलं आणि नव-यालाही सुरुवातीपासून नावाने हाक मारत होते त्यामुळे पुढे तेच कायम राहिलं. माझ्या सासरी खरं तर या गोष्टीवर कुणाचाही आक्षेप नाही पण माहेरी मावशी, आजी वगरे मला अनेकदा म्हणतात ‘अगं, नावाने काय हाक मारतेस, ‘अहो’ म्हणावं’ आणि त्यावर माझं उत्तर असतं की, तोसुद्धा मला ‘अगं’ऐवजी ‘अहो’, तृप्ती, ऐकलंत का? असं म्हणणार असेल तर मला ‘अहो’ म्हणायला काहीच हरकत नाही.’ माझ्या या उत्तरामुळे मी त्यांना अनेकदा अगोचर वगरे वाटते, पण चालायचंच! मला वाटतं, प्रश्न जर मान देण्याचाच असेल तर तो दोघांनीही एकमेकांना द्यायला हवा. नाहीतर समोर असताना ‘अहो’ म्हणायचं आणि इतर वेळी ऑफिसमध्ये, माहेरी, ट्रेनमधल्या मैत्रिणींसमोर ‘तो माझा नवरा’ असं म्हणायचं. त्यापेक्षा मी चारचौघांमध्ये बिनदिक्कत ‘माझा सागर’ असा प्रामाणिकपणे माझ्या नव-याचा उल्लेख करते. त्यात मानही आला आणि प्रेमही!

माझ्या निरीक्षणाप्रमाणे एकमेकांना नावाने हाक मारणा-या जोडप्यांच्या नात्यामध्ये एक वेगळीच सहजता आणि पारदर्शकता दिसते. याउलट नव-याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणा-या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते. आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे. आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नव-याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे. नवरा-बायकोचं नातं हक्काचं, मैत्रीचं आणि पारदर्शक असलं तर पुढची वाट सुकर होते. त्याची सुरुवात नावापासून होते असं म्हणायला हरकत नाही कारण कुठलंही स्थळ आलं की आपण आधी नाव विचारतो आणि म्हणूनच एकमेकांच्या नावांचा आदर करून एकमेकांना नावाने संबोधणं ही खरं तर एका सुंदर नात्याची सुरुवात होऊ शकते.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट