चालू खरीप हंगामामध्ये बासमती तांदळाच्या लागवडीखालील ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता सरकारकडून वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली- चालू खरीप हंगामामध्ये बासमती तांदळाच्या लागवडीखालील ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता सरकारकडून वर्तवली जात आहे. चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशेने ३५ लाख हेक्टरवर या तांदळाची लागवड अपेक्षित असून यातून ८७.५ लाख टनांचे उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भाग ही या तांदळाची पापरंपरिक उत्पादक राज्ये समजली जातात. मात्र या राज्यांव्यवतिरिक्त मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही बासमतीची मोठी लागवड होण्याची शक्यता कृषी आयुक्त जे.एस. संधू यांनी सांगितले. गेल्या वर्षी या तांदळाच्या जातीची २५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.
या वर्षी यात १० लाख हेक्टरची भर पडेल असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने या वर्षी जास्तीत जास्त शेतकरी ‘पुसा १५०१’ आणि ‘पुसा ११२१’ या बासमती वाणांची लागवड करतील असेही संधू म्हणाले. गेल्या वर्षी सर्वसामान्य तांदळाला मिळालेल्या १३१० प्रति क्विंटल या हमीभावापेक्षा शेतक-यांना तिप्पट भाव मिळाला होता.
या वर्षी जर अंदाजाप्रमाणे लागवडीखालील क्षेत्र वाढले तर बासमती तांदळाचे उत्पादन ८७.५ लाख टनांवर जाईल. प्रति हेक्टर २.५ टन उत्पादना अपक्षित असल्याचे संधू म्हणाले. गेल्या वर्षी बासमती तांदळाचे उत्पादन ६२.५ लाख टन उत्पादन झाले होते. तर ७० लाख टनांची निर्यात झाल्याचे ते म्हणाले.
बासमती तांदळाबरोबरच सर्वसामान्य तांदळाखालीलही लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता संधू यांनी व्यक्त केली. आतापर्यंत एकूण ३.३५ कोटी हेक्टरवर तांदळाची लागवड झाली आहे. जी गेल्या वर्षीपेक्षा किंचित जास्त आहे.
शेतकऱ्यांनी अशाच प्रकारची उत्पादने घ्यावीत जेणेकरून त्यांना आर्थिक लाभ तर होईलच, ग्राहकालाही चांगले अन्न खाल्ल्याचेपिक समाधान मिळणार आहे.बासमतीचे पीक घेतांना मात्र साठवणूक आणि वाहतूक यात या अमुल्य धान्याची नासाडी होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी अन शासनाने काळजी घेतली तर शेतकरी राजा आनंदी राहील. अन्नाची नासाडी कमी करणे हि आपली राष्ट्रीय गरज आहे. ….. शेतकऱ्यांना शुभेच्छा.